श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे का? ते भारताच्या नकाशात का दाखवले जाते? जाणून घ्या या मागचं सत्य

तुम्ही म्हणाल की, ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून कदाचित असं दाखवलं गेलं असावं, परंतु जर असं असेल, तर मग भारताला लागून पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार देखील आहेत. मग ते का भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत?

Updated: Jul 13, 2022, 02:59 PM IST
श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे का? ते भारताच्या नकाशात का दाखवले जाते? जाणून घ्या या मागचं सत्य title=

मुंबई : आपण शाळेत अनेक देशाचे आणि राज्याचा नकाशा पाहिला आहे. तसेच आपण त्याचा अभ्यास देखील केला आहे. त्यात आपण भारताच्या नकाशाचा आणि भौगोलिक परिस्थितीचा खोलवर अभ्यास केला आहे. ज्यामध्ये आपल्याला नेहमी श्रीलंका हा दिसतोच. परंतु तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की असे का? म्हणजे भारत आणि श्रीलंका हे दो वेगवेगळे देश आहेत. मग ते एकाच नकाशात का दाखवले जातात? 

आता तुम्ही म्हणाल की, ते आपल्या देशाच्या जवळ आहे म्हणून कदाचित असं दाखवलं गेलं असावं, परंतु जर असं असेल, तर मग भारताला लागून पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार देखील आहेत. मग ते का भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत?

तसेच आपण जर इतिहास पाहिलं तर श्रीलंका कधीही भारताचा भाग राहिलेला नाही. परंतु पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचे भाग होते, ज्यानंतर ते भारतापासून वेगळे झाले आहेत. मग तरीही श्रीलंकाच का नकाशावर दिसतो?

चला यामागची कारणं जाणून घेऊ या.

हे करण्यामागे एक महत्त्वाचा कायदा आहे, भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा आहे, याचा अर्थ असा नाही की, श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे किंवा नकाशाबाबत दोन्ही देशांमध्ये असा कोणताही करार आहे. उलट यामागे एक अतिशय मनोरंजक कारण आहे.

हे करण्यामागे एक सागरी कायदा आहे. याला महासागर कायदा म्हणतात. हा कायदा संयुक्त राष्ट्रांनी बनवला आहे. सन 1956 मध्ये हा कायदा करण्यासाठी युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी (UNCLOS-1) नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती.

1958 साली संयुक्त राष्ट्र संघाने या परिषदेचा निकाल जाहीर केला. या परिषदेत समुद्राशी संबंधित सीमांबाबत एकमत झाले होते. 1982 पर्यंत तीन परिषदा झाल्या. त्यातून समुद्राशी संबंधित कायद्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.

200 नॉटिकल मैल अंतर दाखवणे आवश्यक आहे

भारताच्या नकाशात कोणत्याही देशाच्या बेस लाइनपासून 200 नॉटिकल मैलांच्या आत येणारी जागा दाखवणे बंधनकारक असल्याचा निर्णय कायद्यात घेण्यात आला. म्हणजेच, जर एखादा देश समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असेल, तर अशा स्थितीत त्याच्या सीमेपासून 200 नॉटिकल मैलांच्या दरम्यान येणारे क्षेत्रही त्या देशाच्या नकाशात दाखवले जाईल.

200 नॉटिकल मैल म्हणजे 370 किलोमीटर. त्यामुळे भारताच्या सीमेपासून 370 किलोमीटर अंतरापर्यंतचा भाग नकाशात दाखवण्यात आला आहे. यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा समाविष्ट करण्यात आला आहे.

भारतातील धनुष्कोडीपासून म्हणजेच भारताच्या शेवटच्या टोकापासून श्रीलंकापर्यंतचे अंतर केवळ 18 नॉटिकल मैल आहे.

त्यामुळे भारताच्या नकाशात श्रीलंकेचे महत्त्वाचे स्थान आहे. तर पाकिस्तान, चीन, बांगलादेश किंवा म्यानमार हे सागरी क्षेत्रांतर्गत येत नाहीत. म्हणून त्यांचा समावेश आपण नकाशात करत नाही.