धनुष- ऐश्वर्यामागोमाग आणखी एका मोठ्या सेलिब्रिटीची लेक घटस्फोटाच्या मार्गावर

हा त्या दोघांच्याही जीवनातील अत्यंत खासगी निर्णय.   

Updated: Jan 19, 2022, 11:33 AM IST
धनुष- ऐश्वर्यामागोमाग आणखी एका मोठ्या सेलिब्रिटीची लेक घटस्फोटाच्या मार्गावर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नुकतंच सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि तिचा पती, अभिनेता धनुष यांनी त्यांच्या नात्यात आलेला दुरावा जाहीर केला. चाहत्यांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी होती. पण, सरतेशेवटी हा त्या दोघांच्याही जीवनातील अत्यंत खासगी निर्णय. (Dhanush Aishwarya Divorce )

चाहते मंडळी या धक्क्यातून सावरत नाहीत, तोच आणखी एका सेलिब्रिटी कुटुंबातून घटस्फोटाची कुणकुण समोर आली. 

पुन्हा तेच, सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलीच्या वैवाहिक नात्यात वादळ. 

तेलुगु सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी यांची धाकटी कन्या आणि अभिनेता राम चरण याची बहीण श्रीजा तिचा पती अभिनेता कल्याण धेव याच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचं कळत आहे. 

श्रीजाच्या इन्स्टा हँडलमध्ये आलेल्या बदलामुळं या चर्चांना वाव मिळाला. कारण, तिनं अकाऊंटचं नाव बदलून श्रीजा कोनिडेला असं केलं. 

याआधी तिच्या अकाऊंटचं नाव श्रीजा धेव असं होतं, त्याआधी श्रीजा कल्याण असंही नाव तिनं लावलं होतं. 

श्रीजानं पतीचं नाव आपल्या नावातून हटवलं ही त्यांचं नातं धोक्याच असल्याची चिन्हं तर नाहीत, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला. 

हे असं का झालं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिनंही घटस्फोटाआधी नागा चैतन्यचं नाव आपल्या अकाऊंट हँडलमधून हटवलं होतं. 

येत्या काही दिवसांतच श्रीजा आणि कल्याण त्यांच्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा करतील असं म्हटलं जात आहे. 

मागील वर्षी कल्याणचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण, चिरंजीवी यांच्या कुटुंबातील कोणीच या चित्रपटाची प्रसिद्धी केली नव्हती. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव असल्याच्या चर्चांनी जोर धरला. 

श्रीजाचं हे दुसरं लग्न... 
श्रीजाचं हे दुसरं लग्न. याआधी महाविद्यालयीन दिवसांतील मित्र सिरीश भारद्वाज याच्याशी तिचं लग्न झालं होतं. त्याच्यापासून श्रीजाला एक मुलगी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sreeja (@sreejakonidela)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sreeja (@sreejakonidela)

दरम्यान, श्रीजा आणि कल्याणचं लग्न 2016 मध्ये झालं होतं. दाक्षिणात्य कला जगतातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी या विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली होती. 

लग्नानंतर दोन वर्षांनी या जोडीनं एका चिमुरड्या मुलीचं या नात्यात स्वागत केलं होतं. पण, आता मात्र हे नातं तुटण्याच्या वळणावर आल्याचं म्हटलं जात आहे.