Amitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?

Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?

नेहा चौधरी | Updated: Oct 11, 2024, 11:34 AM IST
Amitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?
Amitabh Bachchan Birthday Big B s third son was considered to be Indira Gandhi So why did Amitabh Bachchan s relationship with the Gandhi family break

Amitabh Bachchan Gandhi Story : बॉलिवूडचा महानायक, एंग्री यंगमॅन, बिग बी म्हणजे आपले अमिताभ बच्चन हे आज 82 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. 11 ऑक्टोबर 1942 ला प्रसिद्ध लेखक हरिवंश राय बच्चन आणि तेजी बच्चन यांच्या घरी अमिताभ यांचा जन्म झाला. हरिवंश यांनी त्यांचं नाव इंकलाब ठेवलं होतं. एवढंच नाही त्यांच आडनाव हे श्रीवास्तव होतं. तर हरिवंशराय हे बच्चन या नावाने लिखाण करायचं पुढे जाऊन त्यांचं आडनाव बच्चन झालं. तर प्रसिद्ध लेख सुमित्रानंदन पंत हे हरिवंशराय यांच्याकडे आले आणि त्यांनी बिग बींचं नाव इंकलाब बदलून अमिताभ ठेवलं. अमिताभ याचा अर्थ अत्यंत तेजस्वी आणि गुणवान असा होता. 

Add Zee News as a Preferred Source

फार कमी लोकांना माहितीय की, अमिताभ बच्चन, राजीव गांधी आणि संजय गांधी एकत्र लहानचे मोठे झाले. कारण अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन या इंदिरा गांधी यांच्या जिवलग मैत्रीण होत्या. एवढंच नाही तर इंदिरा गांधी या बिग बी यांना तिसरा मुलगा मानायच्या. पण त्या एका गोष्टीमुळे बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा आला. 

बालपणीच्या मित्रासाठी बिग बी राजकारणात

1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्यानंतर तडकाफडकी राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली. मग त्यावेळी बालपणीचा मित्र आणि बॉलिवूड सेलिब्रिटी अमिताभ बच्चन यांना राजीव गांधींनी राजकारण यांचा प्रस्ताव ठेवा. मित्रासाठी बिग बी यांनीही तो स्विकारला.

त्यानंतर त्यांनी अलाहाबादमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात लोकसभेसाठी अर्ज भरला. त्यावेळी लोकसभेत प्रचारात बहुगुणा यांनी बिग बी यांची नाचनिया म्हणून खिल्ली उडवली. 

राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचं लग्न हे तेजा बच्चन यांच्यामुळे झालं असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. गांधी घराण्यातील प्रत्येक सुख दु:खात बच्चन कुटुंब हजर असायचं. पण आज गांधी कुटुंबातील कोणत्याही प्रसंगात बच्चन कुटुंब तिथे नसतं. मीडिया रिपोर्टनुसार या दोन कुटुंबातील दुरावा हा बोफार्स घोटाळा ठरला.

असं म्हणतात की अमिताभ बच्चन यांचं नाव जाणूनबुजून त्या अडकवण्यात आलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या करिअरसोबत आयुष्यात भकूंप आला आणि त्यांनी राजकारणासोबत गांधी कुटुंबापासून आपलं नातं तोडलं. 

'या' व्यक्तीमुळे अमिताभ बच्चन झाले कर्जमुक्त 

अमिताभ बच्चन यांचा आणखी एक जवळचे मित्र म्हणजे अमर सिंग (Amar Singh). काँग्रेस (Congress) पक्षातून राजकारणात प्रवेश केलेले अमिताभ बच्चन यांना सर्वच पक्षांचे लोक मान देतात, परंतु मुलायमसिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाशी (एसपी) त्यांचं सखोल संबंध होते. अमिताभ बच्चन यांना अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सरकारच्या अनेक मोहिमांचा चेहरा बनवण्यात आलं होतं.

समाजवादी पक्ष आणि अमिताभ बच्चन यांचं संबंध केवळ जाहिरातींपुरते मर्यादित होते. अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (Amitabh Bachchan Corporation Limited)(ABCL) मुळे दिवाळखोरीत निघालेल्या बिग बी यांना अमर सिंह यांनी तारलं होतं. अमर सिंह यांच्यामुळेच अमिताभ यांना 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या रिअॅलिटी शोमध्ये अँकरची संधी मिळाली आणि बिग बी आपलं कर्ज फेडू शकले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पुन्हा मजबूत झाली.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More