बाजी : हिरा, बाजीला म्हाताऱ्या शेराबद्दल काय सांगते?

मुंबई : बाजी या झी मराठीच्या नवख्या मालिकेच्या १५ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात हिरापासून झाली. हिरा शेराने दिलेल्या झुमक्यांच्या आठवणीत हरवलेली असताना बावन्न खणीत मावळे चौकशी करण्यासाठी येतात आणि त्यांच्या आवाजाने हिरा भानावर येते. दरम्यान बावन्न खणीत कोण कोण येतात अशी चौकशी करून मावळे निघून जातात. दरम्यान बडी बी शेवंताला हिराकडे नीट लक्ष द्यायला सांगते. तेव्हा बाहेरच्या माणसांसमोर बाहेर यायचे नाही असे शेवंता हिराला सांगते. तिकडे बडी बी खोटी का बोलली असे हिरा शेवंताला प्रश्न विचारते ते ऐकून शेवंता हिरावर चिडते.

तेव्हा तिला शांत करत छबू मामा शेवंताला गप्प करून तेथून बाहेर धाडतो. मग तोच प्रश्न हिरा छबू मामाला विचारते. छबू मामाही हिराच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करतो. पण हे सर्वजण काहीतरी लपवत आहेत हे हिराच्या लक्षात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेरा चिंतामणी हाराची काही खबर लागते का बघण्यासाठी बाहेर फिरत असताना, पहारा देत असणाऱ्या मावळ्यांशी पाणी पिण्याचे नाटक करून हाराची खबर काढू पाहतो, तेव्हा त्याला एका मावळ्या कडून कळते की झुमक्याचा पुरावा हाती लागला आहे आणि त्यांचा एक साथीदारही आमच्या ताब्यात आहे. तेव्हा त्याला दुसरा मावळा मध्येच गप्प करतो. दरम्यान लोआच्या किंचाळ्यांचा आवाज ऐकून शेरा तिथून निघून जातो. तिकडे कोतवाल लोआला मारून टाकण्याचे आदेश देतो पण त्याला थोडा वेळ द्यावा असे बाजी सांगतो.

दुसरीकडे गावात दवंडी पिटली जाते की, उद्यापासून तळ्यातल्या गणपतीचे मंदिर दर्शनासाठी खुल्ले होणार आहे. दरम्यान आपल्या घराकडे जाणाऱ्या बाजीला मध्येच हिरा आणि चिचोक्या भेटतात. तेव्हा हिरा त्याला बावन्न खणीत पाच सहा दिवसांपासून येणाऱ्या म्हाताऱ्या शेरा बद्दल सांगते ते ऐकून बाजी हिराचे आभार मानून निघून जातो. हिराने दिलेल्या माहितीवरून बाजी बावन्न खाणीत म्हाताऱ्याचं रूप घेऊन येणाऱ्या शेराला पकडण्यात यशस्वी होईल का ते पाहण्यासाठी बाजी या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका.