एका चुकीमुळे सलमान गमावू शकतो जवळची व्यक्ती; न सांगता निर्णय घेणं पडलं महागात

सलमान खानच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटाचा सिक्वेल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

Updated: Dec 21, 2021, 06:47 PM IST
एका चुकीमुळे सलमान गमावू शकतो जवळची व्यक्ती; न सांगता निर्णय घेणं पडलं महागात  title=

मुंबई : सलमान खानच्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटाचा सिक्वेल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी 19 डिसेंबर रोजी सलमान खानने RRR च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये या चित्रपटाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर सिक्वेलबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत.

प्रमोशन इवेंटमध्ये सलमानने घोषित केलं की, बजरंगी भाईजान २ बनवत आहे. या सिनेमाची कहीणी एसएस राजमौलीचे वडिल केवी विजयेंद्र लिहिणार आहेत. केवीनेच सिनेमाचा पहिला भाग लिहिला होता. 

आता या सिनेमाचं दिग्दर्शन कोणी केलं आहे. यावरुन आता बातम्या येत आहेत. बातम्या आहेत की, सलमान खान एसएस राजामौलीसोबत  सिनेमाला पुढे नेण्याचा प्लान करत आहे.  आता यावर वेग-वेगळे लोकांचे रिएक्शन समोर येवू लागले आहेत. मागच्या सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानने देखील या सिनेमाच्या सिक्वलवर रिएक्शन दिलं आहे. 

त्यांच्या प्रतिक्रियेवरून कबीर खान या घोषणेने नाराज असल्याचं दिसत आहे. आपला आगामी चित्रपट 83 च्या प्रमोशन इवेंटमध्ये बजरंगी भाईजानचे दिग्दर्शक कबीर खान म्हणाले की, ''चित्रपटाची कथा लिहिली गेली नाही आणि स्क्रिप्टही तयार नाही. खुद्द सलमान खाननेच ही घोषणा केली आहे. यावेळी बोलण्यासारखं काही नाही.''

'माझा सिक्वेल बनवण्यावर विश्वास नाही. मला माहित आहे की बजरंगी भाईजान 2 बद्दल चर्चा होत आहे मात्र या संदर्भात कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही. मला कथा आवडली तर मला या सिनेमाचं दिग्दर्शन करायला नक्की आवडेल. या सगळ्यावरुन दिग्दर्शक कबीर खान भाईजानवर नाराज असल्याचं चित्र आहे. याआधी या दोघांनी एकत्र सिनेमा केले आहेत. पण सलमानच्या अशा वागण्यामुळे या चागल्या मैत्रित फूट पडू शकते. हे सगळं पाहता चाहत्यांना या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे एवढं मात्र नक्की