'गोलमाल' चित्रपटातील महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन

कलाविश्वाला मोठा धक्का  

Updated: Jan 24, 2022, 04:31 PM IST
'गोलमाल' चित्रपटातील महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन title=

मुंबई : बॉलिवूडमधून एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. आता पर्यंत अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी कलाविश्वाची साथ सोडली आहे. आत 'गोलमाल’ (Golmaal), ‘बोल बच्चन’ (Bol Bachchan)  आणि  ‘सरकार’ चित्रपटाते निर्माते राजूभाई शाह (Rajubhai Shah) यांचं निधन झालं आहे. शनिवारी रात्रीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याचे वृत्त समजताच संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' चित्रपटाचे निर्माते राजूभाई शाह आता या जगात नाहीत. शनिवारी रात्री गुलमर्ग येथे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजूभाई शाह कुटुंबासोबत  काश्मीरला सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. दरम्यान राजूभाई यांना रात्री साडेअकरा वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. 

आज रात्रीपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर मुंबईत आणण्याची व्यवस्था केली जात आहे. 'त्यांचं पार्थिव शरीर मुंबईत आणणार आहेत. आज रात्रीपर्यंत ते येतील...' अशी माहिती त्यांच्या एका मित्राने दिली आहे.