तीन घटस्फोटांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 70 व्या वर्षी विवाह, कारण...

परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या अफेअरचे किस्से खूपच चर्चेत होते.

Updated: Jan 16, 2022, 08:41 PM IST
तीन घटस्फोटांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या 70 व्या वर्षी विवाह, कारण... title=

मुंबई :  कबीर बेदी हे 80 च्या दशकातील सर्वात शक्तिशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. 'ताजमहाल' आणि 'खून भरी मांग' यांसारख्या चित्रपटांतून बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं नाव निर्माण करणाऱ्या कबीर बेदींनी जेम्स बाँडच्या 'ऑक्टोपी' चित्रपटापर्यंत हॉलिवूडमध्ये काम केले.

कबीर बेदी यांचा 16 जानेवारीला वाढदिवस आहे. कबीर बेदी एक दमदार अभिनेते तर आहेतच, शिवाय एक महान माणूसही आहेत. पण त्यातही एक सत्य आहे की ते आयुष्यभर खऱ्या प्रेमासाठी आणि सहवासासाठी भटकत राहिले. कबीर बेदींनी चार विवाह केले. परवीन बाबीसोबतच्या त्यांच्या अफेअरचे किस्से खूपच चर्चेत होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कबीर बेदी यांनी परवीन बाबी यांच्या बद्दलची त्यांची व्यथा तर व्यक्त केलीच, पण त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा गौरीसोबतच्या लग्नाबद्दलही खुलेपणाने बोलले. एवढेच नाही तर वयाच्या 70 व्या वर्षी चौथे लग्न करण्याची गरज किंवा आग्रहावरही कबीर बेदींनी मौन सोडले आहे.

कबीर बेदी यांनी पहिले लग्न ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा गौरीशी केले. दोघांना पूजा बेदी आणि एक मुलगा सिद्धार्थ देखील होता, ज्याने वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी आत्महत्या केली.1997 मध्ये आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर कबीर बेदी खूपच तुटून गेले होते.

कबीर बेदी यांनी प्रोतिमासोबत 1969 मध्ये लग्न केले, पण 1974 मध्ये हे नाते तुटले. त्याचे एक कारण होते, परवीन बाबीसोबतची अभिनेत्याची वाढती जवळीक. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, परंतु दोघांनी कधीही लग्न केले नाही.

Kabir Bedi Love Life: Protima Gupta, Parveen Babi, Susan Humphreys, Nikki  Bedi, Parveen Dusanj

यानंतर कबीर बेदींनी 1980 मध्ये ब्रिटिश फॅशन डिझायनर सुसान हमप्रेसशी लग्न केले. हे नातेही केवळ 10 वर्षे टिकले.

Kabir Bedi deeply disappointed by daughter Pooja's venomous comments  against wife | People News | Zee News

कबीर बेदी यांनी निक्की बेदीसोबत तिसरे लग्न केले. सुसानपासून घटस्फोट झाल्यानंतर दोन वर्षांनी 1992 मध्ये हे लग्न झाले आणि 2005 मध्ये हे नाते तुटले. यानंतर, 2005 मध्ये, त्यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, कबीर बेदींनी परवीन दोसांझशी लग्न केले.

काळानुसार त्यांच्यासाठी प्रेमाचा अर्थ बदलला आहे का? एका मुलाखतीत कबीर बेदी म्हणतात, 'प्रेम हे देवासारखे असते. हा सर्वात जास्त वापरला जाणारा आणि गैरवर्तन केलेला शब्द आहे. याबद्दल प्रत्येकाची स्वतःची संकल्पना आहे.

प्रेम म्हणजे एकत्र राहणे आणि एकमेकांचा आदर करणे. माझे आई-वडील, बाबा प्यारे लाल सिंग बेदी आणि फ्रेडा बेदी हे क्रांतिकारक ते धार्मिक बनले. अध्यात्मिक व्यक्ती म्हणूनही, ते त्यांच्या वेगळ्या मार्गाने गेले. माझी आई बौद्ध नन बनली आणि माझे वडील इटलीमध्ये तत्वज्ञानी झाले. तरीही त्यांच्यात नेहमीच प्रेम आणि आदर असायचा. हीच प्रेमाची व्याख्या आहे.'