कंगनानं ऋतिकसोबतच्या संबंधांबद्दल केले अनेक धक्कादायक खुलासे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आलीय. एका खाजगी चॅनलवर मुलाखत देतना कंगनानं आत्तापर्यंत कधीही समोर न आलेल्या गोष्टींना स्पष्टपणे बोलून दाखवल्यात 

Updated: Sep 2, 2017, 04:36 PM IST
कंगनानं ऋतिकसोबतच्या संबंधांबद्दल केले अनेक धक्कादायक खुलासे title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आलीय. एका खाजगी चॅनलवर मुलाखत देतना कंगनानं आत्तापर्यंत कधीही समोर न आलेल्या गोष्टींना स्पष्टपणे बोलून दाखवल्यात 

या गोष्टी आहेत अभिनेता ऋतिक रोशनसोबत असलेल्या संबंधांविषयी आणि ब्रेकअपनंतर एकमेकांना पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटिशींविषयी... गनानं या टीव्ही शोमध्ये ऋतिक रोशन आणि आपल्या संबंधांबाबत अगदी मोकळेपणानं चर्चा केलीय.

घटस्फोटानंतर लग्नाचं वचन

'काईटस्' आणि 'क्रिश ३'मध्ये या दोघांनी सोबत काम केलंय. पत्नीशी घटस्फोटानंतर लग्नाचं वचनही ऋतिकनं दिलं होतं... नंतर मात्र ओळखही देण्यास त्यानं नकार दिला, असं कंगनानं म्हटलंय. 

२५ जानेवारी २०१६ मध्ये आलेल्या एका बातमीनुसार, ऋतिकच्या सांगण्यावरून 'आशिकी ३' सिनेमात कंगनाऐवजी सोनम कपूरला घेण्यात आलंय... त्यानंतर २७ जानेवारी २०१६ मध्ये कंगनाला याबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा कंगनानं 'हे तर मुकं गाढवही सांगू शकेल की या अफवा कुठून येत आहेत. माझ्यासाठी हा चॅप्टर बंद जालाय आणि मी मेलेले मुडदे बाहेर काढायचे नाहीत'... आणि यानंतरच कंगना आणि ऋतिकमध्ये सुरू झालेला वाद आत्तापर्यंत थंड झालेला नाही.

२०१४ मध्ये नातं संपुष्टात

नुकत्याच एका टीव्ही कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरं देताना कंगनानं म्हटलंय ' २०१४ मध्ये आमचं दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. नात्यात असताना मी त्याला काही २-४ मेल पाठवले होते... परंतु, त्यानंतर त्यानंच माझ्या अकाऊंटवरून स्वत:ला मेल पाठवले... मी त्याला हे शेकडो मेल पाठवले होते तर तो तेव्हा शांत का राहिला? आणि दोन वर्षानंतर त्याला आठवलं की मी त्याला हजारो मेल पाठवलेत? सात वर्ष ज्या मुलीसोबत काम केलं तिला एक फोन करून तू सांगू शकत नव्हता की यार मेल करणं बंद कर...'

म्हणून त्यानं केल्या अशा गोष्टी

'पण, त्यानं हे मेल एकत्र केले, त्याची फाईल बनवली... आणि भारताचा एक प्रसिद्ध क्रिमिनल वकील शोधून, मला या मुलीपासून वाचव सांगत त्याच्याकडे ही केस सोपवली... त्याला जगाला सांगायचं होतं की या मुलीचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि जर मी त्याच्याकडे लग्नाचा विषय काढलायच तर तो म्हणू शकेल की हिची मानसिक स्थिती ठिक नाही म्हणून ही अशी बडबडतेय'

ऋतिकसोबत नातं

यासोबत कंगनानं आपलं ऋतिकसोबत असलेल्या नात्यावरही भाष्य केलंय. 'असं नाही की ऋतिकनं मला नादाला लावलं होतं... त्यानं मला स्पष्टपण म्हटलं होतं... कंगना मी एका नात्यात आहे आणि मी तुला सार्वजनिक रुपात कधीही स्वीकार करू शकणार नाही. त्यामुळे आपलं लग्न होऊ शकणार नाही... कुटुंबामुळे मी पत्नीला कधीही सोडू शकणार नाही... त्यामुळे मी त्याला मला सोडण्यास सांगितलं... आमच्या दरम्यान हे सुरू असताना त्याच दरम्यान त्याच्या पत्नीनं त्याला सोडलं... त्यामुळे त्याचा पारा चढला... त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा बोलताना घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यानं मला लग्नाचं आश्वासन दिलं होत' असं कंगनानं म्हटलंय.