शो बंद होण्यावर आणि तब्येतीवर पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा

अभिनेता कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगला वादात सापडला आहे. कधी शोचं शुटिंग रद्द, कधी टीआरपी कमी होणं, तर कधी शो बंद होण्याच्या चर्चांमुळे तो नेहमीच चर्चेत राहत आहे.

Updated: Sep 7, 2017, 09:09 PM IST
शो बंद होण्यावर आणि तब्येतीवर पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा title=

मुंबई : अभिनेता कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगला वादात सापडला आहे. कधी शोचं शुटिंग रद्द, कधी टीआरपी कमी होणं, तर कधी शो बंद होण्याच्या चर्चांमुळे तो नेहमीच चर्चेत राहत आहे.

त्यामुळे त्याच्या विरोधात वातावरण तयार झाल्याचं बघायला मिळत आहे. आता कपिलने शोबाबत आणि त्याच्या तब्येतीबाबत मोकळेपणाने वक्तव्य करत अनेकांची बोलती बंद केली आहे. 

एनबीटीला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की, ‘मी सध्या बंगळुरूमध्ये आयुर्वेदिक ट्रिटमेंट घेत आहे. मला माझी बॉडी पूर्णपणे फिट करण्याची गरज आहे. मला आशा आहे की, मी सप्टेंबर शेवटपर्यंत मुंबईत परत येईन. गेल्या काही दिवसात माझ्याबाबत जे काही बोललं आणि लिहिलं गेलंय त्यातील बहुतेक खोटं आहे’.

तो म्हणाला की, ‘मी गेल्या १० वर्षांपासून काम करत आहे आणि तेही ब्रेकशिवाय. टेन्शन, थकवा, ब्लड प्रेशर, शुगर प्रॉब्लेम आणि खाणं-पिणं सुधारण्यासाठी मला मेडिकल हेल्पची गरज होती. काही वर्षांपासून मी माझ्या आरोग्याकडे फारच दुर्लक्ष केलंय. त्यामुळे मला वाटले की, याकडे दुर्लक्ष केल्यापेक्षा मी ब्रेक घेतो’.

'द कपिल शर्मा शो' बंद होण्याबाबत तो म्हणाला की, ‘सोनी टिव्हीसोबत माझं वेगळं नातं आहे. दुसरं कोणतही चॅनेल असतं तर त्यांनी माझ्यावर शो पुढे सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकला असता. पण सोनीने तसं केलं नाही. जर आणखी एखादा शो कॅन्सल झाला असता तर मी आता आणखी सहन करू शकलो नसतो. त्यामुळे मीच त्यांना मला ब्रेक देण्याचा आग्रह केला. त्यांनीही होकार दिला. मी माझा मेडिकल कोर्स पूर्ण केल्यानंतर शो सुरू करण्याआधी माझ्या सिनेमाचं शुटिंग पुर्ण करणार आहे. सोनीला सोडण्याचा माझा कोणताच विचार नाहीये’.