लागिरं झालं जी : शितलं आपलं घर कसं वाचवणार?

मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ६ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात जयडी आणि पुष्पा यांच्यापासून झाली. जयडीला कडाक्याची भूक लागलेली असते परंतु शीतलचा स्वैयंपाक झालेला नसतो यावरून पुष्पा मामी शीतलला खोडकरपणे डिवचते. दरम्यान जीजी शीतलला पालेभाज्या आहेत का विचारते. काही घरी काहीच नाही असे सांगून हल्ली काही मिळत नाहीत भाज्या. पण तेवढ्यातच मामी म्हणते मिळतात की, पण आणायला जाणार कोण? मग जीजी पुष्पालाच म्हणते तू आण तिकडे जातेस तर. दरम्यान जीजीला मीच आणेन असे सांगून शीतल जीजीला गप्प करते.

दुसरीकडे घरावर जप्ती आल्याने घर सोडून जावे लागणार या विचाराने शीतलचे आई बाबांना जुन्या आठवणीत हरवून जातात. दुसरीकडे शीतलच्या घरावर जप्ती येणार या गोष्टीने खुश होऊन आनंदात गाणी गातो. व अपमानाची आज परतफेड होणार या सुखाने भय्या आनंदात बेभान होतो. काही वेळाने जप्ती करणारी माणसं नानांच्या घरी येतात आणि जप्ती सुरु करू का असे विचारतात. पुढे घरातील सामानाची सर्व बांधाबांध करून नाना आणि कुटुंब घर सोडून जायला निघणार एवढ्यात त्यांची मजा घेण्यासाठी भय्यासाहेबही तेथे येतात आणि आपल्या भद्दाड्या स्वभावाने भोचत प्रश्न नानांना करतात.

त्यावर काहीही उत्तर न देत अगदी हलक्या स्वरात नाना भय्याला म्हणतात, जे नशिबात होतं ते झालं. नशीब काय कुणी बदलत नाही ना. भय्याने खेळलेल्या या खेळीचा डाव उधळण्यासाठी शीतल कोणते पाऊल उचलते हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा पुढील एपिसोड आवर्जून बघा अगदी न चुकता.