लग्नानंतर मीच तडजोड केली; लग्नानंतरच्या आयुष्यावर नेहा पेंडसेचे वक्तव्य चर्चेत

Neha Pendse :  नेहा पेंडसेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्यावर वक्तव्य केलं आहे. तिनं यावेळी सांगितलं की लग्नानंतर तिनं तडजोडी केली आहे तिचा पती काहीही करत नाही. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2023, 01:43 PM IST
लग्नानंतर मीच तडजोड केली; लग्नानंतरच्या आयुष्यावर नेहा पेंडसेचे वक्तव्य चर्चेत title=
(Photo Credit : Neha Pendse Instagram)

Neha Pendse : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे ही तिच्या कामासोबत तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नेहा ही मराठमोळी अभिनेत्री असली तरी देखील ती इतर भाषांमध्ये देखील काम करते. नेहाचे लाखो चाहते आहेत. जे तिच्या कामाचं कौतुक करताना दिसतात. अशात त्यांची आवडती अभिनेत्री ठरलेली नेहा हिचं खासगी आयुष्य कसं आहे ती काय करते हे सगळं जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर असतात. नेहा तिच्या खासगी आयुष्याविषयी जास्त बोलताना दिसत नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नेहानं तिच्या खासगी आयुष्याविषयी आणि त्यातल्या त्यात तिच्या लग्नाविषयी काही महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. 

नेहानं नुकतीच राजश्री मराठीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नेहानं तिच्या लग्नाविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नेहा 2020 मध्ये शार्दुल सिंग बायससोबत सप्तपदी घेतल्या. तेव्हा पासून तिला अनेकांनी तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारले. शाार्दुलसोबत लग्न करण्याचं कारण काय तर त्यांची भेट कशी झाली या सगळ्याच गोष्टी. तर त्याशिवाय दोन वेळा घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीसोबत लग्न का केलं हा देखील एक प्रश्न असतो. यात आता लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं आहे असा देखील अनेकांना प्रश्न आहे. लग्नानंतरच्या आयुष्यावर बोलताना नेहा म्हणाली, “लग्न हे कधीच गुलाबांच्या पाकळ्यांसारखं नसते. कोणतंही लग्न हे कधीच तडजोडी केल्याशिवाय टिकत नाही. इतकंच नाही तर लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला तडजोड करावी लागते. पण लग्न झाल्यानंतर मीच तडजोड केली. त्यानं काही केलंच नाही. पण तुम्ही या तडजोडी तेव्हाच करु शकता, जेव्हा तुमचा समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. तुमचे त्या व्यक्तीवर प्रेम असते आणि त्यासोबत तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असते. जेव्हा तुम्हाला बॅलेन्स करता येतो तेव्हा सगळं सोपं होतं. त्यामुळेच अशा परिस्थितीत स्त्रीयांना तडजोड करणं सोपं होतं. सगळ्या गोष्टी या ठिक आहे मध्ये जातात. म्हणजे, ठिक आहे ना तो करतो ना ते, ठिक आहे ना तो सांभाळून घेतो ना. खरंतर या ठिक आहे मध्येच आमचा साडेतीन वर्षांचा संसार केला आणि तो अजून सुरु आहे."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

हेही वाचा : तुझ्या ब्रेस्टला हाथ लावू शकतो का? Sherlyn Chopra कडे दिग्दर्शकानं केली होती विचित्र मागणी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nehha Pendse (@nehhapendse)

शार्दुलनं नेहाशी लग्न करण्याआधी दोनवेळा लग्न केलं होतं आणि दोन्ही वेळा त्याला संसार करण्यात यश मिळालं नाही. शार्दुलला दोन मुली देखील आहेत. दरम्यान, जेव्हा नेहानं शार्दुलशी लग्न केलं तेव्हा तिनं दोनवेळा घटस्फोट घेतलेल्या व्यक्तीशी लग्न केल्यामुळे ट्रोल करण्यात आले होते.