दिवाळीनंतर आर्यन खान 'मन्नत' पासून दूर राहणार, शाहरूख - गौरीचा मोठा निर्णय

आर्यनच्या भविष्याचा विचार करून खान कुटुंबियांचा मोठा निर्णय 

Updated: Nov 1, 2021, 08:44 AM IST
दिवाळीनंतर आर्यन खान 'मन्नत' पासून दूर राहणार, शाहरूख - गौरीचा मोठा निर्णय title=

मुंबई : SRK shift Aryan Khan from Mannat after Diwali: शाहरूख खान आणि गौरी खानच्या 'मन्नत' वर पुन्हा एकदा आनंदाच कारण आहे. शाहरूख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात  26 दिवस आर्थर रोड जेलमध्ये होता. गेल्या काही दिवसांपासून किंग खानच्या घरी आणि मन्नतवर तणावाचं वातावरण होते. आर्यन खान आता जामीनावर सुटला असून तो मन्नतवर आहे. यानंतर शाहरूख खान आणि गौरी खान आपल्या मुलासाठी खूप मोठा निर्णय घेणार आहेत, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. 

आर्यन खानला ड्रग्स प्रकरणावर जामीन मंजूर झाला. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. मात्र आता तो मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. आर्यन खानला पासपोर्ट न्यायालयात जमा करायचं आहे. असं असलं तरी आर्यन खानला दिवाळीनंतर 'मन्नत' पासून दूर जायचं आहे. आर्यन काही दिवस अलिबागच्या फार्म हाऊसमध्ये राहणार आहे. शाहरूखला असं वाटतंय की, आर्यन काही दिवस या सगळ्यापासून लांब राहावा. जेणे करून त्याची मानसिक स्थिती सुधारेल. 

'मन्नत' वर गेल्या तीन आठवड्यांपासून निराशा होती. एसआरके आणि गौरीने त्यांच्या हितचिंतक आणि मित्रांना आर्यन जामिनावर बाहेर येईपर्यंत मन्नतला भेट न देण्याची विनंती केली होते. आणि आता त्यांनी मन्नतचे दरवाजे सर्वांसाठी पुन्हा उघडले आहेत. 'मन्नत'मध्ये आता उत्सवाची वेळ आली आहे. या दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  SRK आणि गौरी आर्यनला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रसार माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहेत. गेल्या काही आठवडे आर्यनसाठी खूप गंभीर आहेत आणि त्यांना त्याला थोडा मोकाळा श्वास द्यायचा आहे. 

आर्यन खान जामिनावर बाहेर आहे. म्हणजे आर्यनला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागला. आता, दिवाळीच्या सणानंतर आर्यनला मन्नतपासून दूर जाणार असल्याचं कळलं आहे. आर्यन सध्या त्यांच्या अलिबाग फार्महाऊसमध्ये राहणार असल्याची माहिती एका सूत्राने दिली. अलिबाग गैर-प्रतिबंधित क्षेत्रांतर्गत येते. शाहरुख खानचा अलिबागमध्ये एक मोठा बंगला आहे. आर्यनला काही काळ तिथेच ठेवावे अशी शाहरूख खान आणि गौरी खानची इच्छा आहे. आर्यन खानवरचा आघात हा मोठा आघात आहे. त्याला यामधून बाहेर काढण्यासाठी खान कुटुंबियांचे प्रयत्न सुरू आहेत.