तुम्ही शिळं अन्न अशापद्धतीने तर खात नाही ना? हे शरीरात विषाप्रमाणे काम करु शकते

आयुर्वेदानुसार, शिजवल्यानंत अन्न तीन तासांच्या आत खा.

Updated: Oct 8, 2021, 05:50 PM IST
तुम्ही शिळं अन्न अशापद्धतीने तर खात नाही ना? हे शरीरात विषाप्रमाणे काम करु शकते title=

मुंबई : आपल्यापैकी बहुतेक लोक ते स्वयंपाक केल्यानंतर ते उशिरा खातात किंवा कधीकधी ते फ्रिजमध्ये बराच काळ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी खातात. परंतु आयुर्वेदानुसार ही पद्धत योग्य नाही, कारण ती तुमच्या शरीराला हानी पोहोचवते. बऱ्याचदी असे घडते की, तुम्ही कामात व्यस्त असता ज्यामुळे तुम्ही लवकर जेवण बनवून ठेवता किंवा सकाळी लवकर घराबाहेर पडायचं असेल, तर काही लोकं रात्रीच जेवण बनवुन ठेवताच. परंतु तुम्हाला माहित आहे? असे केल्याने तुमच्या शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही.

असे म्हटले जाते की, जर तुम्ही उरलेले अन्न पुन्हा गरम केले तर त्यात असलेले जीवाणू आणि रोगजनकांचा मृत्यू होतो आणि तुम्ही ते खाऊ शकता पण आयुर्वेदानुसार उरलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या शरीराला फायदा होत नाही.

स्वयंपाक झाल्यानंतर तीन तासांच्या आत खा

यात काही शंका नाही की, उरलेले अन्न आपल्याला ताजे अन्नाप्रमाणे पोषण देत नाही. त्यामुळे आयुर्वेदानुसार, शिजवल्यानंत अन्न तीन तासांच्या आत खा.

अन्न 24 तासांपेक्षा जास्त काळ साठवले जाते

जर तुम्हाला दररोज असे घडले की तुम्ही इतक्या वेगाने खाऊ शकत नाही, तर लक्षात ठेवा की तुम्ही दीर्घकाळ साठवलेले अन्न कधीही खाऊ नका. 24 तासांपेक्षा जास्त काळ साठवलेले अन्न खाऊ नका.

पचनावर परिणाम

अन्नपदार्थ साठवण्याची आणि त्यांना पुन्हा गरम करण्याची तुमची पद्धत योग्य असावी, जेणेकरून अन्नपदार्थांमध्ये जीवाणू वाढू नयेत.

आयुर्वेदानुसार, जर तुम्ही उरलेले अन्न व्यवस्थित साठवून ठेवले नाही आणि दीर्घकाळानंतर ते खाल्ले तर असे अन्न दोष वाढवते आणि पचनशक्तीवर परिणाम करते.

बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका

विशेषत: मांस आणि सीफूड सारख्या गोष्टींमुळे असे घडते की त्यांच्यामध्ये जीवाणू आणि रोगजनकांच्या वाढू लागतात. जर या गोष्टी 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्या असतील तर ती खाल्ल्याने तुम्हाला खूप नुकसान होईल.

आवश्यक पोषण मिळत नाही

तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच वेळा असा सल्ला दिला जातो की तुम्ही उरलेले अन्न पुन्हा गरम करून खाऊ शकता, पण यात अडचण अशी आहे की पुन्हा गरम केल्यामुळे अन्नामधील जीवनसत्त्वा सारखे पोषक घटक नष्ट होतात. आयुर्वेदानुसार, ताजे अन्न खाल्ल्याने पोषण मिळते आणि गॅस्ट्रिक एनर्जी वाढते.

बर्‍याच लोकांना अन्नपदार्थ पुन्हा गरम करुन खाण्याची सवय असते, पण ही योग्य पद्धत नाही आणि हे तुमच्या एकूण आरोग्याला हानी पोहचवते. तसेच अशा शिळ्या अन्नामुळे आपल्याला विषबाधा होण्याचा देखील धोका आहे.