Health News : आपल्या आजूबाजूला पाहिलं आहे की, टपरीवरील चहा हा प्लॅस्टिकच्या पिशवीत दिला जातो. तर अनेक खाद्यपदार्थ हे वृत्तपत्र म्हणजेच न्यूज पेपरमध्ये बांधून दिली जातात. आपणही अनेक वेळा पोळी आणि भाजीसाठी पेपर आणि फॉइलचा वापर सर्रास करतो. पण आपली ही पद्धत आपल्या जीवाशी खेळ आहे. फॉइल, कागद किंवा पिशवीत पोळी भाजी ठेवणे त्वरित थांबवलं पाहिजे, असं आवाहन FSSAI ने केला आहे. (news paper aluminum foil for wrapping food dangerous fssai warning side effects)
वृत्तपत्रासाठी वापरली जाणारी शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो.
प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येता. त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. FSSAI ने सांगितलं की, त्याशिवाय जीवाणू, विषाणू देखील कागदावर मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन तुमच्या गंभीर आजार होऊ शकतो.
तुमची पाचन समस्या बिघडून तुम्हाला विषबाधा होण्याची शक्यता असते. तुम्ही वरच्यावर अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं तर तुम्हाला पोटाचा विकार होऊ शकतो. यातून भविष्यात कर्करोगाचा धोका वाढतो, असं आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. वृद्ध आणि लहान मुलं यांना अशा पदार्थ दिले तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असतं त्यामुळे या लोकांना सर्वाधिक धोका निर्माण होतो.
त्याशिवाय आज काल अनेक जण प्लॅस्टिक आणि फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यातूनही रसायन अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील अन्न खाणे तुम्हाला महागात पडू शकतं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसंच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.