Life Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...

Facts About Kidney: किडनी हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकतो. काय म्हणतयं संशोधन...   

Updated: Feb 1, 2023, 07:44 PM IST
Life Without Kidney: खरचं काय! दोन्ही मूत्रपिंडांशिवाय माणूस जगू शकतो? जाणून घ्या सत्य...  title=

Kidney Disease: बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्यावरही दुष्परिणाम होत असतात. याचा परिणामी सर्वाधिक किडनी (Kidney Health Diet) होत असतो. किडनीचे आरोग्य धोक्यात येणार नाही, यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचं महत्त्वपूर्ण काम किडनी करते. जर मूत्रपिंड निकामी झाल्यास किंवा व्यक्तीच्या शरीरातून दोन्ही मूत्रपिंड काढून टाकल्यास, व्यक्ती जास्त काळ जगू शकत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिसवर ठेवले तर तो किडनीशिवाय वर्षानुवर्षे जगू शकता का? जाणून घ्या यामागचं नेमकं सत्य काय आहे?

नुकतीच बिहारमधून एक घटना समोर आली. त्या घटनेत एका डॉक्टरने एका महिला रुग्णाच्या दोन्ही किडन्या (Kidney) काढून पळ काढला. या महिला रुग्णाचे नाव सुनीता असून ती रुग्ण महिला गेल्या चार महिन्यांपासून किडनीविना आयुष्य जगत आहे. सुनीता यांचे दर दोन दिवसांनी डायलिसिस केले जात असल्याने ती जिवंत आहे. या घटनेनंतर एकच प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे दोन्ही किडनी नसतानाही माणूस जगू शकतो का? 

दरम्यान जगात असे अनेक लोक आहेत जे एका किडनीवर जिवंत आहेत. अनेक वेळा एखाद्या आजारामुळे व्यक्तीची किडनीही काढली जाते. अशा स्थितीत माणसाची एकच किडनी रक्त शुद्ध करण्याचे काम करते. पण जर एखाद्या व्यक्तीला एकही किडनी नसेल तर उपचाराशिवाय त्याला जगणे शक्य नसते. 

वाचा: Facebook वर चुकूनही 'ही' नाव सर्च करु नका, जावं लागेल तुरुंगात

किडनीशिवाय किती काळ जगू शकते 

किडनी डायलिसिसशिवाय मानवी शरीर डायलिसिस कसे स्वीकारत आहे यावर व्यक्तीचे आयुष्य अवलंबून असते. डायलिसिसवर एखादी व्यक्ती वर्षे किंवा दशके जगू शकते. त्यासाठी त्याला दर दोन दिवसांनी डायलिसिस करावे लागते.

किडनी प्रत्यारोपण अनेक जण करतात

बिहार घटनेतील सुनीताच्या बाबतीत, तिच्या पतीची किडनी तिची किडनी जुळू शकलेली नाही. तिच्यावर सध्या मुझफ्फरपूरच्या एसके मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक लोक त्यांना त्यांची किडनी दान करण्यासाठी येथे आले होते, पण जुळत नसल्याने त्यांचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही. किडनी प्रत्यारोपणासाठी दात्याचा आणि रुग्णाचा रक्तगट जुळणे आवश्यक आहे. यानंतर, दात्याचे आणि रुग्णाचे टिश्यू मॅच केले जाते. जर दोन्ही नीट जुळले तरच किडनी प्रत्यारोपण केले जाते. मात्र, यानंतरही त्या व्यक्तीचे शरीर किडनी नाकारण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला एक वर्ष नियमित तपासणी करावी लागते. एक वर्षानंतर, मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी मानले जाते कारण ते नाकारण्याची केवळ 10 टक्के शक्यता वाचतात.  

किडनी प्रत्यारोपणानंतर अशी घ्या काळजी

जर एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले असेल, तर त्याला त्याच्या जीवनशैलीत धूम्रपान सोडणे, वजन कमी करणे आणि चांगला आहार घेणे यासारखे अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील.