देशात कोरोनाची दुसरी लाट ओसतेय, या गोष्टी देत आहेत संकेत

देशात कोरोना संसर्ग कमी होण्याबाबत काही चांगले संकेत मिळत आहेत. 

Updated: May 12, 2021, 11:11 AM IST
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसतेय, या गोष्टी देत आहेत संकेत title=
representative image

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्ग कमी होण्याबाबत काही चांगले संकेत मिळत आहेत. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगाना सह 18 राज्यांमध्ये दररोज होणाऱ्या रुग्णवाढीत घट होत आहे. 

 

  • देशात गेल्या 24 तासात ऍक्टिव रुग्णांची संख्या 30 हजाराने कमी झाली आहे. गेल्या 61 दिवसांमध्ये मंगळवारी रुग्ण वाढीपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक होती.
  • दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हटले की, कोरोनाचा पिक हळु हळु कमी होत आहे.
  • देशात सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या शहरांमध्ये मुंबई, पुणे, लखनऊ, कानपूर, भोपाल, पटना, रांची आदींमध्ये रुग्णवाढीत घट
  • देशात 15 ते 21 एप्रिल दरम्यान रुग्णसंख्येत घट होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या 73 होती. तीच 29 ते 5 मे दरम्यान, 182 इतकी झाली होती.
  • केरळ, मुंबई, पुण्यातही कंन्टेन्टमेंट झोनमुळे पॉझिटिव्ह होण्याचा दर घसरला.
  • केंद्र सरकारने मंगळवारी म्हटले की, कोविड19 च्या नविन रुग्ण आणि मृत्यूंमध्ये घट होण्याचे संकेत मिळत आहेत.
  • दुसरी लाट हळु हळु मंदावत आहे.
  • देशात 14 दिवसांनंतर नवीन रुग्णांचे प्रमाण 3.29 लाखावर आले आहे.

----------------------

महाराष्ट्र सावरतोय 

महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात सोमवारी केवळ 37 हजार 236 नवीन केसेस नोंदवले गेले आहेत. या आधी कोरोना संक्रमित नवीन केसेसची संख्या 60 हजार ते 65 हजार ओलांडत असत. परंतु गेल्या 6 -7 दिवसांपासून या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. ज्यामुळे दिवसातील नवीन केसेस 50 हजार ते 55 हजारांवर स्थिर होऊ लागली होती आणि त्यानंतर अचानक सोमवारची रुग्ण संख्या सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती.

कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर सोमवारी नवीन पॅाझिटिव्ह रुग्णांचा हा इतका कमी आकडा खरोखरच विक्रमी आकडा आहे. सुमारे दीड महिन्यांनंतर, महाराष्ट्रात इतके कमी केसेस समोर आले आहेत आणि कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या बाबतीत मुंबईने तर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

दुसरी एक महाराष्ट्रासाठी चांगली बातमी ही आहे की, आता मुंबई सारखेच महाराष्ट्रातील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही कोरोना बाधीत होणाऱ्या नवीन रुग्ण संख्येपेक्षा जास्त आहे. सोमवारी नवीन पॉझिटिव्ह केसेसपेक्षा कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही खूपच जास्त होती. महाराष्ट्रात सोमवारी 61 हजार 607 जणांनी कोरोनावर मात केली आहे.