पाणी पिणा-या BSF जवानावर पाकचा हल्ला, भारतीय सैन्याने दिलं प्रत्युत्तर

जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.  भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 26, 2017, 10:45 PM IST
पाणी पिणा-या BSF जवानावर पाकचा हल्ला, भारतीय सैन्याने दिलं  प्रत्युत्तर  title=
File Photo

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानने पून्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.  

भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात ३ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, पाकिस्तानच्या जवानांनी पाणी पिणा-या बीएसएफ जवानावर गोळीबार केला. यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.

भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात तीन पाक सैनिक मारले गेले आहेत.

सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. शहीद जवानांमध्ये २ जवान सीआरपीएफ आणि ३ जवान जम्मू-काश्मीर पोलीस होते. यावेळी भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.