11 लोकांचा गूढ मृत्यू : पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

मृत्यू की आत्महत्या 

11 लोकांचा गूढ मृत्यू : पोस्टमार्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा  title=

मुंबई : बुराडीत एकाच कुटुंबातील 11 लोकांच्या मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. एकाच कुटुंबातील 11 लोकांची झालेली अशी हत्या ही संशयास्पद आहे. ही आत्महत्या आहे की गूढ मृत्यू यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास घेत असताना आता पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. यामुळे अनेक गुंता सुटला असल्याचं म्हटलं जातं आहे. 

काय आहे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये?

या रिपोर्टनुसार, 11 लोकांचा मृत्यू हा गळ्याला फास लागल्यामुळेच झाला आहे हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित या कुटुंबातील मोठा मुलगा. याच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्याने पूजेच्या नावाखाली पत्नीच्या मदतीने कुटुंबातील इतर व्यक्तींचा जीव घेतला आहे. सर्वांना पूजा करण्याच्या बहाणा करून फासावर लटकवलं आहे. तसेच रजिस्टरमध्ये देखील असेच सांगितले आहे. मात्र ललितच्या बहिणीचं म्हणजे सुजाताचं म्हणणं आहे की, त्यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 वर्षापूर्वी ललित यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मनोरूग्ण असलेला ललित असा दावा करायचा की, वडिलांची आत्मा त्याच्या शरिरात प्रवेश करत असे. आणि तो या सगळ्या गोष्टी रजिस्टरमध्ये लिहित असे. 

कधीपासून लिहित होता रजिस्टर 

ललित 2015 पासून रजिस्टर लिहित असे. त्या रजिस्टरमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की बड पूजेकरता त्याच्या वडिलांनीच त्याला सांगितलं होतं. ललितने घरी सगळ्यांना सांगितलं होतं की, घरी 10 ते 15 मिनिटे ही पूजा होणार आहे. पोलिसांना संत नगर भागात एकाच घरातील १० जण फाशी घेऊन मृत झालेले आढळले. तर घरातल्याच वृद्ध महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळला. या सगळ्या मृतदेहांच्या डोळ्यावर आणि तोंडावर पांढरी पट्टी बांधण्यात आली होती. तर सगळ्यांच्या कानामध्ये कापूस घालण्यात आला होता. पोलिसांना घरातून दोन रजिस्टर मिळाली आहेत. यामध्ये काही धार्मिक गोष्टी लिहिल्या आहेत.