केंद्र सरकारवर प्रियंका गांधी संतापल्या, कृषीविषयक कायदे मागे घेण्यावर पाहा त्या काय म्हणाल्या?

काँग्रेसच्या (Congress) प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi) यांनी मोदी यांच्यावतीने तीन कृषी कायदे (Three Agricultural Laws)  मागे घेण्याच्या घोषणेनंतर आपला संताप व्यक्त केला.  

Updated: Nov 19, 2021, 02:00 PM IST
केंद्र सरकारवर प्रियंका गांधी संतापल्या, कृषीविषयक कायदे मागे घेण्यावर पाहा त्या काय म्हणाल्या? title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने तीन कृषी कायदे (Three Agricultural Laws)  मागे घेण्याच्या घोषणेनंतर आपला संताप व्यक्त केला. केंद्र सरकारला समजले आहे की देशातील शेतकऱ्यापेक्षा  (Farmers) मोठा कोणीही नाही. माफी मागून काय होणार? ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले, त्या मंत्र्याला आधी बडतर्फ केले पाहीजे, असे सांगत संताप व्यक्त केला.

तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहणार - टिकैत

प्रियंका गांधी म्हणाल्या की, आजही पंतप्रधान मोदींसोबत ते मंत्री मंचावर उभे आहेत. ज्यांच्या मुलाने शेतकऱ्यांची हत्या केली. पीएम मोदी लखनऊला आले. पण मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले नाहीत आणि आता माफी मागत आहेत. जेव्हा 600-700 शेतकरी शहीद झाले. ते माफी का मागत आहेत? निवडणुका येत आहेत हे या देशाला समजत नाही का? परिस्थिती योग्य नाही, असे त्यांना वाटत असावे. विधानसभेचे सर्वेक्षण आले आहे, त्यात त्यांना गोष्टी दिसत आहेत. आता निवडणुकीपूर्वी ते माफी मागण्यास आले आहेत.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्याच सरकारच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना काय सांगितले नाही हे समजून घ्यायला हवे? आंदोलक, गुंड, दहशतवादी आणि देशद्रोही, हे सर्व कोणी बोलले? हे सर्व बोलले जात असताना पंतप्रधान गप्प का होते? उलट त्यांनीच आंदोलक हा शब्द उच्चारला. शेतकर्‍यांच्या हत्या होत असताना, शेतकर्‍यांना मारले जात होते, शेतकर्‍यांवर लाठ्या मारल्या जात होत्या आणि त्यांना अटक होत असताना हे कोण करतंय? आपलेच सरकार करत होते.

त्या पुढे म्हणाल्या की, आज तुम्ही कायदा मागे घेणार असल्याचे सांगत आहात, मग आम्ही कसा विश्वास ठेवणार? आम्ही तुमच्या हेतूंवर कसा विश्वास ठेवू? देशासमोर सर्व काही आहे. या देशात शेतकऱ्यापेक्षा मोठा कोणी नाही हे या सरकारला समजले याचा मला आनंद आहे. या देशातील एखाद्या सरकारने शेतकऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकरी उभा राहिला तर सरकारला नमते घ्यावे लागेल. या सरकारला समजले आहे. या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. सरकार गंभीर असेल तर लखीमपूरच्या आरोपींवर योग्य ती कारवाई करावी. मंत्र्याला बडतर्फ करा, अशी त्यांनी मागणी केली.