पूजेच्या वेळी मंदिरात घंटा का वाजवली जाते? याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवलीच पाहिजे.

Updated: Jan 14, 2022, 12:49 PM IST
पूजेच्या वेळी मंदिरात घंटा का वाजवली जाते? याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या title=

मुंबई : आपण जेव्हाही मंदिरात जातो तेव्हा आपण नेहमीच देवाच्यासमोरील घंटा वाजवतो आणि मग देवासमोर हात जोडून देवाचं दर्शन घेतो. एवढेच काय तर आपण घरी देखील देवाची पुजा करतो तेव्हा घंटा वाजवतो आणि मग देवासमोर हात जोडतो. जर कोणी असं केलं नाही तर त्या व्यक्तीला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटते. परंतु असं का होतं? देवासमोर घंटा का वाजवली जाते? या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का?

शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेच्या वेळी घंटा वाजवलीच पाहिजे. कारण घंटा वाजल्याने मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तींना जाणीव होते आणि तुमची पूजा देवापर्यंत पोहोचते.

यामागच्या सायन्सबद्दल बोलायचं झालं तर, बेल वाजवताना जो मोठा आवाज येतो तो शरीरातील सात चक्रांना सक्रिय करतो. हे मेंदूच्या उजव्या आणि डाव्या लोबमध्ये सुसंवाद साधते. त्यामुळे त्यांच्यात एकता निर्माण होते. सर्व नकारात्मक विचार देखील ते काढून टाकतं.

घंटा वाजवल्याने निर्माण होणारा ध्वनी एखाद्या धक्क्यासारखे कार्य करतो जो आपल्याला वर्तमानात लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. हे अनेक धातूंपासून तयार केले जाते ज्यात विशेष उपचार गुणधर्म आहेत. विज्ञानानुसार, घंट्यांमधून बाहेर पडणारा आवाज आपला मेंदू सक्रिय करतो आणि माणसाचे लक्ष एका जागेवर केंद्रित होते.

याशिवाय घंटेच्या आवाजामुळे हवेतील हानिकारक सूक्ष्म जंतू नष्ट होतात. वास्तविक, बेलमधून बाहेर पडणाऱ्या आवाज खूप मोठा असतो आणि त्या आवाजामुळे वातावरणातील जंतू पूर्णपणे नष्ट होतात. असे झाल्यावर पूजा करताना स्वच्छ वातावरण मिळते.

बेलच्या आवाजामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता एकत्रित होते. ती जागा शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे घरातील मंदिरांमध्ये घंटा डाव्या बाजूला ठेवावी. त्याची फुलांनी पूजा करावी.