राजनाथ सिंहाच्या वक्तव्यावर ओवैसींची टीका, म्हणाले सावरकरांना...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची टीका

Updated: Oct 13, 2021, 01:41 PM IST
राजनाथ सिंहाच्या वक्तव्यावर ओवैसींची टीका, म्हणाले सावरकरांना...  title=

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर टीका करत AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मंगळवारी म्हटले की, भाजप लवकरच विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील. ANI शी केलेल्या संभाषणात ओवेसी म्हणाले की, 'हे लोक इतिहास तोडून-मोडून सादर करत आहेत. हे असेच चालू राहिले तर हे लोक महात्मा गांधींची जागा घेतील आणि सावरकरांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करतील.

ते म्हणाले की, सावरकर महात्मा गांधी हत्या प्रकरणातही आरोपी होते आणि न्यायमूर्ती जीवन लाल कपूर यांच्या चौकशी अहवालात "हत्येत सहभागी" असल्याचं म्हटलं गेलं होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना सांगितले की, विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून ब्रिटिश सरकारसमोर दया याचिका दाखल केली होती.

संरक्षण मंत्री  (Rajnath Singh) म्हणाले की, हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या सावरकरांनी महात्मा गांधींच्या सूचनेवरून अंदमान तुरुंगात कैद असताना ब्रिटीश सरकारपुढे दया याचिका दाखल केली होती, परंतु स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान भिन्न विचारांवर विश्वास ठेवणाऱ्यांनी बदनाम केले. ते आता सहन केले जाणार नाही. ते म्हणाले की, राष्ट्रीय नायकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि कार्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, परंतु विचारसरणीच्या प्रिझमद्वारे वीर सावरकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि अपमान करणे क्षम्य आणि न्याय्य नाही.

राजनाथसिंह यांनी उदय माहूरकर (Uday Mahurkar) आणि चिरायू पंडित यांच्या 'वीर सावरकर हु कुड हैव प्रीवेंटेड पार्टिशन' या पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. राजनाथ सिंह म्हणाले, "एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेले विभाग वीर सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेशी अपरिचित आहेत आणि त्यांना त्याची योग्य समज नाही, ते प्रश्न उपस्थित करत आहेत."

राजनाथ सिंह म्हणाले की, 'वीर सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी होते, अशा परिस्थितीत विचारसरणीच्या प्रिझममधून पाहून त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा अपमान करणे क्षम्य नाही.'