Newlyweds Go to Jejuri After Marriage : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे प्रत्येक राज्याची आपली परंपरा आणि प्रथा आहे. इथे लग्नाच्या वेगवेगळ्या रितीरिवाज पाहिला मिळतात. महाराष्ट्रात लग्नाबद्दल अनेक सुंदर आणि प्राचीन परंपरा आहेत. ज्या आजही मोठ्या उत्साहाने पाळल्या जातात. अशा अनेक प्रथा आहे, ज्यामागील कारण अनेकांना माहिती नाही. पण पूर्वीपासून चालत आली म्हणून ती परंपरा किंवा प्रथा आजही पाळली जाते. पण एखाद्या प्रथेमागील कारण समजल्यावर ते निभवण्यात एक वेगळाच आनंद आणि विश्वास असतो. लग्नानंतरची अशीच प्रथा आहे, नवीन जोडपं हे देवदर्शनाला जात असतं. सत्यनारायणाची पूजा झाल्यावर आपल्या शहरातील आणि कुलदैवतेच्या दर्शनासाठी जातात. अगदी महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्राचे नवीन जोडप दर्शन घेतात.
महाराष्ट्रातील नवविवाहित जोडप्यांमधील ट्रेंडिंग देवदर्शनाचं ठिकाण म्हणजे जेजुरी. चित्रपटात दाखवल्याप्रमाने इथे नवरा हा आपल्या बायकोला उचलून दर्शनासाठी येतो, आजकाल याची क्रेझ तुम्हाला पाहिले मिळते. सोशल मीडियावर तर जेजुरी नवविवाहत जोडप्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिला मिळतात. पण तुम्हाला माहितीये का लग्नानंतर नवविवाहित जोडपी जेजुरीला का जातात? यामागे केवळ श्रद्धा नाही तर सुंदर परंपरा सुद्धा दडलेली आहे. चला तर मग यामागील कारण जाणून घेऊयात.
जेजुरीचा खंडेराया हा अनेकांच्या घराचा कुलदैवत आहेत. त्यामुळे बहुतांश लोक त्याच्या दर्शनासाठी जातात. पण प्रमुख कारण म्हणजे खंडेराया हे शिवाचं रुप, तर म्हाळसा देवी ही पार्वतीचं रुप मानले जाते. त्यामुळे शंकर आणि पार्वतीसारखा आपला संसार सुखी व्हावा, असा त्यामागील उद्देश असतो.
असं मानलं जातं की जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेतल्यावर संसारातले वाद, अडचणी दूर होऊन संसाराची सुरुवात आनंदी होते. बऱ्याच कुटुंबांमध्ये पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे गोंधळ विधी खास जेजुरीतच केला जातो. अलीकडे नवऱ्याने बायकोला उचलून गड चढण्याची पद्धत प्रेम व्यक्त करण्यासाठी सुरू झाली आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.