श्रीनगर-शारजाह विमानसेवेमुळे पाकिस्तान चवताळला, हवाई क्षेत्र केलं बंद

भारताच्या एका निर्णयाने पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा चक्रावला आहे. 

Updated: Nov 3, 2021, 04:11 PM IST
श्रीनगर-शारजाह विमानसेवेमुळे पाकिस्तान चवताळला, हवाई क्षेत्र केलं बंद title=

मुंबई : भारताच्या एका निर्णयाने पाकिस्तान (Pakistan) पुन्हा एकदा चक्रावला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच सुरू केलेल्या श्रीनगर-शारजाह (Srinagar-Sharjah) विमानांना पाकिस्तानने आपल्या हद्दीतून (airspace) जाण्यास बंदी घातली आहे. आता श्रीनगरहून शारजाहला जाणाऱ्या विमानांना उदयपूर आणि अहमदाबादमधून जावे लागणार आहे. यामुळे हा प्रवास दीड तासाचा होणार असला तरी प्रवाशांवर आर्थिक बोजाही वाढणार आहे.

ओमर अब्दुल्ला पाकिस्तानवर भडकले

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाकिस्तानच्या या कृतीचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, 'हे अत्यंत दुर्दैवी आहे. 2009-2010 मध्ये श्रीनगर ते दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातही पाकिस्तानने असेच केले होते. मला अपेक्षा होती की गो फर्स्ट विमानाला पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्याची परवानगी मिळणे हे चांगले संबंधांचे लक्षण आहे, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही.

पाकिस्तान घाबरला

पाकिस्तानने आपल्या हद्दीतून विमानांना जाण्यास नकार देऊन आंतरराष्ट्रीय उड्डाण नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. श्रीनगर ते शारजाह या विमानसेवेचा सर्वाधिक फायदा काश्मीरमधील लोकांना होत होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.

पाकिस्तानच्या नकारानंतर शारजाहला जाणारी विमाने उदयपूर, अहमदाबाद आणि ओमानमार्गे जातील. त्यामुळे विमान प्रवासही लांबणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयालाही पाकिस्तानच्या या निर्णयाची माहिती मिळाली आहे.

वाद का वाढला?

उल्लेखनीय आहे की, गृहमंत्री अमित शहा यांनी 23 ऑक्टोबर रोजी जम्मू-श्रीनगर दौऱ्यात या विमानसेवेचा शुभारंभ केला होता. तेव्हापासून हा वाद वाढत गेला. भारत सरकार आणि दुबई यांच्यात झालेल्या करारानंतर श्रीनगर-शारजाह विमानसेवा थेट सुरू करण्यात आल्याने शेजारी देशही नाराज झाला होता. पाकिस्तानची हवाई हद्द वापरण्यापूर्वी पाकिस्तानकडून परवानगी घेण्यात आली नव्हती.