मन की बात: पंतप्रधानांकडून जनतेला रक्षाबंधन, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

आशियायी खेळांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंचंही पंतप्रधानांनी कौतूक केलं.

Updated: Aug 26, 2018, 02:22 PM IST
मन की बात: पंतप्रधानांकडून जनतेला रक्षाबंधन, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा title=

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४७व्या मनकी बात मधून देशवासीयांशी संवाद साधला.. यावेळी त्यांनी देशवासियांना रक्षाबंधन तसेच गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या..

केरळमधील अपत्तीबाबत तीव्र दु:ख

केरळमध्ये आलेला महापूरामुळे झालेल्या जीवीत तसंच वित्त हानीबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं.. या प्रसंगी संपूर्ण देशवासीयांनी केलल्या मदतीचं विशेष करुन एनडीआरएफच्या जवानांचंही कौतुक केलं..

खेळाडूंचे कौतूक

आशियायी खेळांमध्ये विजय मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंचंही पंतप्रधानांनी कौतूक केलं.