Lakhimpur Kheri Violence : देशातील लोकशाही भ्रष्ट झाली आहे? संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची दिल्ली निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत लखीमपूर हिंसाचार घटनेवर चर्चा झाली

Updated: Oct 5, 2021, 05:25 PM IST
Lakhimpur Kheri Violence : देशातील लोकशाही भ्रष्ट झाली आहे? संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका title=

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी तब्बल 20 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवर बोलताना संजय राऊत यांनी देशात लोकशाही उरली आहे का?, लोकशाही भ्रष्ट झाली आहे अशी टीका केली. लखीमपूर हिंसाचार घटनेसह देशातील इतर घटनांवर चर्चा झाल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं. 

लखीमपूरची घटना आणीबाणीपेक्षा भयानक

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्ताने माखल्याचा टोला, शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay raut) यांनी लगावला. शेतकरी आंदोलन करताना लखीमपूरची दुर्घटना ही शेतकरी, मजूर यांच्यासाठी लांच्छनास्पद आहे. हा एका राज्याचा विषय नाही, अन्यायासाठी लढणाऱ्यांना असे केले जातं असेल तर जगासाठी हे धोकादायक आहे. ही भारत पाकिस्तान लढाई आहेका, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

अशी घटना महाराष्ट्र, केरळ, राजस्थानमध्ये झाली असती तर भाजप रस्त्यावर उतरले असते. पण आज शेतकऱ्यांचे दुःख समजावून घ्यायला पण तिथं कुणाला जाऊ दिल जातं नाही, असे राऊत म्हणाले. काँग्रेस सोबत मतभेद असू शकतात, पण इंदिरा गांधी यांच्या नातीला अशी वागणूक देत आहात, हे योग्य नाही, असे राऊत म्हणाले. 

लखीमपूर घटनेची चौकशी करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लखीमपूर हिंसाचार घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. त्याचवेळी आपली बाजू मांडणाऱ्या शेतकऱ्यावर दडपशाही करण्यात आली आहे. लखीमपूरची घटना हा शेतकऱ्यांवर झालेला हल्लाच (Attack on Farmers) आहे, शरद पवार म्हणाले.  या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.