राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे चिन्ह, पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा

राजस्थानमध्ये अनेक आमदार आपल्याच सरकारवर नाराज

Updated: May 18, 2021, 05:20 PM IST
राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे चिन्ह, पायलट गटाच्या आमदाराचा राजीनामा title=

जयपूर : राजस्थानमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पेचदेखील वाढताना दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे समर्थक आमदार पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार हेमाराम चौधरी यांनी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे.

सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

मंगळवारी बाडमेरच्या गुडमलानी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हेमाराम चौधरी यांनी सभापतींकडे आपला राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तीव्र झाले आहे. त्यांनी राजीनाम्याचे हे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सभापतींना पाठवले आहे. जे व्हायरल होत आहे. विधानसभेचे सभापती डॉ. सीपी जोशी यांनी अद्याप यासंदर्भात माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मी अडीच वर्षे आमदार नाही तर हरकत नाही

आमदार हेमाराम चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ई-मेल व पोस्टद्वारे पाठविला आहे. ते म्हणाले की याआधीही मी राजीनामा पाठविला होता, तो मान्य झाला नाही. पण नंतर पक्षाने आपले मत बदलले होते. यादरम्यान त्यांनी राजीनामा देण्याचे कोणतेही कारण दिले नाही. आमदार म्हणाले, मी अडीच वर्षे आमदार होतो. पुढचे अडीच वर्षे आमदार राहिलो नाही तर काय होईल.

यापूर्वीही केली होती बंडखोरी

हेमाराम चौधरी हे सचिन पायलट गटाचे आहेत. गेल्या वर्षी ते पायलट यांच्या गटात होते. ज्या 19 आमदारांनी त्यांच्याच सरकारविरूद्ध बंड केले. त्याचबरोबर यावर्षी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्याच पक्षाने त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांमध्ये भेदभावाचा आरोप केला होता. त्यांच्या जागी आमदार हरीश चौधरी यांना मंत्री करण्यात आले होते.

गहलोत सरकार पुन्हा संकटात 

आपल्याच सरकार विरोधात बंड करणाऱ्या आमदारांमध्ये हेमाराम चौधरी, माजी मंत्री रमेश मीणा, आमदार वेदप्रकाश सोलंकी, मुरारीलाल मीना आणि माजी मंत्री विश्वेंद्र सिंह यांचा समावेश आहे. गहलोत सरकारच्या कारभारावर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे गहलोत सरकार पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं टेन्शन देखील वाढणार आहे.