सध्या IPL 2024 वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. यामधील काही क्रिकेटर्स आपल्या लग्नांमुळे देखील जास्त चर्चेत राहिले. क्रिकेटर्सचे अफेअर्स ते घटस्फोट या सगळ्याची चर्चा होते. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय खेळाडू शिखर धवनची.
आयपीएलमध्ये पंजाब संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या धवनची प्रेमकहाणी खूपच विचित्र आहे. आधी तो त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या आयशा मुखर्जीच्या फेसबुकवर प्रेमात पडला आणि नंतर मतभेद झाल्यानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. आधी प्रेमविवाह आणि नंतर घटस्फोट! असे काय झाले की या प्रेमळ जोडप्याचे नाते टिकले नाही? तुम्ही त्याच चुका पुन्हा करत आहात का?
शिखर धवन आणि आएशा मुखर्जी यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. या दोघांचं नातं भारतीय गोलंदाज हरभजन सिंह यांच्यामुळे जवळ आलं. कारण आएशा ही हरभजनची मैत्रीण होती. धवनने फेसबुकवर आएशाचे प्रोफाईल पाहिल्यानंतर तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आएशानेही ती ऍक्स्पेक्ट केली. हळूहळू यांची मैत्री पुढे वाढत गेली आणि 2012 मध्ये दोघांनी लग्न केले.
आएशा आधीच घटस्फोटित होती. शिखरशी बोलायला सुरुवात करण्यापूर्वीच तिचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. पहिल्या पतीपासूनच्या दोन मुलींमुळे आयशा ऑस्ट्रेलियात राहत होती. याचे कारण असेही होते की तिने आपल्या पतीला वचन दिले होते की ती मुलांची काळजी घेईल. शिखरसोबत लग्न झाल्यानंतर 2013 मध्ये मुलगा जोरावरचा जन्म झाला तेव्हा तोही ऑस्ट्रेलियात राहू लागला. यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला होता. अखेर दोघांनीही इन्स्टाग्राम पोस्टमधून घटस्फोट झाल्याची माहिती दिली.
या दोघांचं नातं इतकं पुढे जाऊन का तुटलं. शिखर आणि आयशाने कोणत्या चुका केल्या ज्या आपण आपल्या नात्यामध्ये टाळू शकतो.
नात्यामध्ये संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. अशावेळी नात्यामधील दुरावा अधिक वाढतो. एखाद्या जोडप्यामध्ये नीट संवाद साधता येत नसेल तर ते भविष्यात घटस्फोटाचे कारण बनू शकते. गोष्टी लपवणे, गैरसमज असणे, राग दीर्घकाळ टिकवून ठेवणे इत्यादी गोष्टी तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये दरी निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचे नाते घटस्फोटापर्यंत जाण्यापासून वाचवायचे असेल, तर तुमच्या भावना, गरजा आणि इच्छा उघडपणे आणि प्रामाणिकपणे शेअर करा. तसेच एकमेकांना वेळ द्या, यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ देणार नाही आणि यामुळे तुमचे प्रेम आणखी घट्ट होईल.
नात्यामध्ये दुरावा येण्याचं दुसरं कारण आहे अविश्वास, धोका. जेव्हा एक जोडीदार दुसऱ्याचा विश्वासघात करतो तेव्हा ते नातेसंबंध तुटण्यास कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल तर तुमच्या पार्टनरला कधीही फसवू नका. तुमची एक चूक नातेसंबंधात अविश्वास, तणाव आणि शंका निर्माण करते, जी समोरच्या व्यक्तीला माफ करणे खूप कठीण असते.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.