यश एकाला मिळतं अन् दुसऱ्याला नाही, असं का होतं? सद्गुरुंनी सांगितलं 'या' मागचं कारण

हल्ली प्रत्येकजण यशाच्या मागे धावताना दिसत आहे. सकाळपासून ते अगदी रात्रीपर्यंत प्रत्येकजण कामात दिसतात. अशा प्रकारचे मेहनत आज अनेकजण करत आहेत. पण एकालाच यश मिळत आणि दुसऱ्याला का नाही? नेमकं काय चुकतं? यावर सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 31, 2024, 03:54 PM IST
यश एकाला मिळतं अन् दुसऱ्याला नाही, असं का होतं? सद्गुरुंनी सांगितलं 'या' मागचं कारण  title=

Sadhguru Quotes on Success: यश हा एक शब्द जो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने मेहनत घेतो. कुणाचे स्वप्न कंपनीत मोठे पद मिळवण्याचे असते तर कुणाचे स्वप्न स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे असते. प्रत्येकजण यासाठी आपले रक्त आणि घाम देतो. तरीही एका व्यक्तीने यश संपादन केले तर दुसऱ्या व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते, हे सामान्यपणे पाहायला मिळते.

या परिस्थितीमागे अनेक कारणे असू शकतात, परंतु सद्गुरुंनी एक मुख्य कारण तपशीलवारपणे सांगितले. हेच कारण आहे ज्याकडे सामान्यतः कोणीही लक्ष देत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की तो आपले ध्येय साध्य करण्यात खूप मागे पडतो.

सद्गुरुंनी सांगितलं कारण 

त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सद्गुरू म्हणाले, 'एका व्यक्तीला यश मिळते आणि दुसऱ्याला का मिळत नाही? यशासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्यता निर्माण करणे. व्यवसायात यश मिळविण्यासाठी, अभ्यास करावा लागतो आणि कोणीही ते साध्य करू शकतो आणि सक्षम होऊ शकतो. पण प्रत्येक परिस्थितीत तुम्ही स्वतःला आंतरिकपणे कसे हाताळता, तुम्हाला आतून किती आनंद वाटतो, हे कोणतीही पदवी शिकवू शकत नाही.

व्यवसायामध्ये कॉम्पिटेंस मिळवण्यासाठी अभ्यास करुन तुम्ही यश संपादन करु शकता. पण या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला सांभाळणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही मनापासून किती सुखी आहात हे तितकंच महत्त्वाचं आहे. 

तुमचे विचार, हेतू आणि भाव शुद्ध असेल तर तुमचे इनर कॉम्पिटेंस सकारात्मक असतात. या आंतरिक भावामुळे तुम्ही सगळ्यांसोबत असूनही अतिशय खुश असतात. ज्यामुळे लोकांना तुमचं अधिक आकर्षण वाटतं. एवढंच नव्हे तर तुम्ही प्रत्येकाला हवे हवेसे वाटते. 

याचा असा होतो लाभ 

स्किल्स आणि अंतर्मनाची प्रसन्नता तुमच्याकडे असल्यामुळे अनेकांना तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा असते. त्यामुळे तुमचं सर्कल वाढत जातं. एवढंच नव्हे तर अनेक लोकांना तुमच्यासोबत संपर्क ठेवण्याचे खास प्रयत्नही करतात. 

दुसऱ्या व्हिडिओमध्ये याबद्दल बोलताना सद्गुरुंनी स्पष्ट केले होते की जर आंतरिक क्षमतेवर काम केले तर हळूहळू दररोज स्वतःवर लादलेली बंधने तुटू लागतात. एखादी व्यक्ती अनेक वेळा आपली कौशल्ये सुधारण्यास सक्षम असते.

त्याच्यासाठी यापुढे कोणी काय करत आहे हे महत्त्वाचे नाही. त्याऐवजी, तो स्वत: ला अशा पातळीवर घेऊन जातो की इतर त्याच्यापासून प्रेरणा घेऊ लागतात. आणि असे लोकच यश मिळवतात.