राज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले

Maharashtra Rain​ : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. 

Updated: Jul 24, 2021, 08:39 AM IST
राज्यात पावसाचे 136 बळी; 6 जिल्ह्यांत रेड अलर्ट, पाहा कुठे किती नुकसान झाले title=

मुंबई: Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे (Landslide) सुमारे 129 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या चिंतेत भर पडली आहे. मध्य महाराष्ट्रातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज, भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. 1 जूनपासून राज्यात पावसाचे 136 बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. (136 deaths due to rains in Maharashtra; Red alert in 6 districts)

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप 20 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा 70पर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. तर  साताऱ्यात मिरगावात दरड कोसळून 12 ठार, आंबेघरमध्ये 17 जण दरडीखाली अडकल्याची भीती आहे. रत्नागिरीत जिल्ह्यातील पोसरेत 4 जण ठार, तर 13 जण बेपत्ता झाले आहेत. तर चिपळूणमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

पंचगंगेचा कोल्हापूरला तर सांगलीला कृष्णेचा वेढा

कोल्हापूर आणि सांगलीचे टेन्शन वाढले आहे. पंचगंगेचा कोल्हापूरला, तर सांगलीला कृष्णेचा वेढा दिसून येत आहे. 2019 पेक्षा मोठं संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. दरम्यान, पश्चिम कोकणात सिंधुदुर्गात रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला.. या पावसामुळे सिंधुदुर्गातील कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांत पुराचं पाणी शिरलंय. माडखोल, सावंतवाडी, आंबोली मार्गावरही तीन ते चार फूट पाणी आहे. 

 खेड तालुक्यात दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना

महाडपाठोपाठ रत्नागिरीत जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. पोसर गावात दरड कोसळून १७ जण गाडले गेले आहेत. यातल्या  4 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलाय.  तर  डिघा-याखाली अडकलेल्या १३ जणांचा शोध सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. पोसरे खुर्दच्या बौद्धवाडीत काल रात्री १८ घरांवर डोंगर खचून दरड कोसळली.  घटनास्थळी एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. 

दरम्यान, शुक्रवारी पुणे विभागातील,  84,452 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मुसळधार पाऊस आणि थोड्या वेळाने नद्यांमुळे महाराष्ट्रातील पुणे विभागातील सुमारे,  84,452लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

सांगली-सातारा येथे धोका कायम

ज्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले त्यापैकी 40 हजाराहून अधिक लोक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर शहरालगतची पंचगंगा नदी 2019 मध्ये पूर पातळीच्यावर वाहत आहे. पुणे आणि कोल्हापूरसह जिल्ह्यात सांगली आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने सातारा चांगलाच परिणाम झाला आहे.

भूस्खलनानंतर 30 लोक बेपत्ता

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृतांपैकी 38 जण समुद्रकिनारी रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे झाले. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यासाठी एक नवीन रेड अलर्ट जारी केला असून येत्या चोवीस तासात जिल्ह्यातील डोंगराळ घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून, दरड कोसळल्यानंतर सुमारे 30 लोक बेपत्ता झाले आहेत.  शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात एक बस नदीत वाहून गेली. बसमधून आठ नेपाळी कामगारांसह 11 जणांना वाचविण्यात यश आले.

हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आधीच पावसाने तडाखा बसलेल्या सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे राज्यातील लोकांना पावसापासून काहीसा दिलासा मिळालेला दिसत नाही. आयएमडीने 'मुसळधार पावसाचा' अंदाज वर्तविला आहे आणि खबरदारीच्या उपाययोजनांची शिफारस केली आहे. किनारी भागातील कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पुढील 24 तास रेड अलर्ट बजाविण्यात आला आहे.

लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले

अधिकतर मृत्यू रायगड आणि सातारा जिल्ह्यात झाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. भूस्खलन वगळता अनेक लोक पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या 27 सांगितली. रायगड जिल्ह्यातील महाड तहसीलच्या तलाई गावाजवळ गुरुवारी सायंकाळी दरडी कोसळली. त्याचबरोबर एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक अधिकारी महाडमध्ये बचावकार्यात व्यस्त आहेत.