अयोध्या दौऱ्यानंतर अंबाबाईकडे साकडं घालताना ठाकरे म्हणतात...

...आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलं

Updated: Dec 19, 2018, 10:23 AM IST
अयोध्या दौऱ्यानंतर अंबाबाईकडे साकडं घालताना ठाकरे म्हणतात...  title=

कोल्हापूर : 'यापुढे देशात बिन जुमल्याचे सरकार येऊ दे' असं साकडं उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला घातलंय. सध्या, आदित्य ठाकरे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महाआरती केली त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी हे विधान केलय.

प्रत्येक निवडणूक आली की राम मंदिर उभारणार अशा गर्जना सुरू होतात... आत्ताही पाच राज्यांच्या निवडणुकीत हेच झालं... आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याचं आयोजन केलं... असंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 

या दौऱ्याच्या निमित्तानं भाजप सरकारला हे विचारावं लागलं की खरंच तुम्ही राम मंदिर बांधणार आहात की हा जुमला आहे? आत्ता नाही बांधलं तर कधी बांधणार? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी भाजपला विचारलाय.