जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

आरक्षाबाबत प्रकाश आंबेडकर यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 18, 2024, 04:58 PM IST
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही; प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य title=

Prakash Ambedkar : राज्यात आरक्षणाचा वाद पेटला आहे. मराठा आणि OBC आरक्षणावरुन वाद सुरु आहेत. अशातच  वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही अस वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

गृह मंत्रालयाने 45 जागांसाठी काढलेल्या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून काही प्रश्न उपस्थित केले आहेय. एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवायचे हे भाजपचे मॉडेल आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर, भाजप-आरएसएस बाबासाहेबांच्या कार्याला तुकड्या तुकड्याने पुसून टाकत आहेत. 

ही 45 पदे पार्श्वभरतीऐवजी UPSC परीक्षेद्वारे भरली असती तर 6 पदे SC, 3 ST आणि 12 OBC प्रवर्गात गेली असती. जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाही तोपर्यंत आरक्षण धोक्यात नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 
भाजप-आरएसएस हे आरक्षणविरोधी आहेत, ते बाबासाहेबांची विचारधारा एक एक करून नष्ट करण्याचे काम करत आहेत. अशाच चुकीच्या धोरणांविरोधात 20 ऑगस्ट रोजी नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणं गरजेचं

ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे 100 आमदार निवडून आणणं गरजेचं आहे, असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी केलंय.  जोपर्यंत 100चा आकडा गाठत नाही, तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे, असं ते म्हणाले. दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना आंबेडकरांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. '225 समाजाचे उमेदवार निवडून येतील. असं स्टेटमेंट शरद पवारांनी केलंय, यानंतर वातावरण चिघळलंय', असा गंभीर आरोप आंबेडकरांनी पवारांवर केलाय.