राज्यात कोरोनाचे थैमान! आजपर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च वाढ

आज राज्यात नवीन कोरोना रुग्णांची सर्वोच्च वाढ झाली आहे.

Updated: Mar 20, 2021, 09:34 PM IST
राज्यात कोरोनाचे थैमान! आजपर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च वाढ title=

मुंबई :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई आदी शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.

राज्यात आज नव्याने 27 हजार 126 रुग्णांची नोंद झाली आहे. आजवरची राज्यातील ही सर्वाधिक नोंद आहे. 

राज्यात आज कोरोना संसर्गामुळे 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घालायला सुरूवात केली आहे असे दिसून येत आहे. 

मुंबईत आज दिवसभरात 2 हजार 982 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.