सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर

सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला.

Updated: Jan 2, 2018, 09:18 AM IST
सरकारला आश्वासनांचा विसर, औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर title=

औरंगाबाद : सरकार शेतक-याला दिलेली आश्वासनं पाळत नसल्याने औरंगाबादेत शेतकरी रस्त्यावर उतरले. रस्त्यावर दूध फेकत शेतक-यांनी सरकारचा निषेध केला. १ जून २०१७ ला शेतकरी संप मिटवण्यासाठी सरकारनं अनेक आश्वासनं दिली होती. मात्र यातील एकही सरकारनं पाळलं नसल्याचा आरोप शेतक-यांनी केला. 

सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक होळी

यावेळी सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक होळी सुद्धा करण्यात आली. दुधाचे दर वाढवले जातील असं आश्वासन सुद्धा सरकारनं दिलं होतं, प्रत्यक्षात दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी झाले. त्यामुळं शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकून सरकारचा निषेध येणाऱ्या चार महिन्यात महाराष्ट्रात सरकार विरोधी चळवळ उभारणार असल्याचं किसान क्रांती संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं.  औरंगाबादला किसान क्रांतीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.

सुकाणू समितीमध्ये दिलजमाई

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी स्थापन झालेल्या सुकाणू समितीमध्ये दिलजमाईसाठी प्रयत्न सुरु झालेत. समिती मध्ये कुठलीही फुट पडली नसून गैरसमज झाल्याच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. शेतक-यांची कर्जमाफीसह इतर प्रश्नावर चर्चा करण्यसाठी १६ जानेवारीला मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यात तोडगा निघाला नाहीत तर सरकार विरोधात असहकार आंदोलन छेडण्याची घोषणा त्यांनी केली.