Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Maharashtra Rain LIVE Updates:..तर ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधातही लढेन- राज ठाकरेंच्या शिलेदाराचा हुंकार 

Maharashtra Rain LIVE Updates: मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री करणार पाहणी

Maharashtra Rain Live Updates:  महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, पाणी शहरात शिरण्याची शक्यता

25 Jul 2024, 09:03 वाजता

उल्हास नदीने ओलांडली इशारा पातळी

उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कल्याण नगर मार्गावरील रायते पुलाला नदीचे पाणी लागले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास उल्हासनदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.उल्हास नदीची पातळी वाढल्यास कल्याण नगर मार्गावरील रायते पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. 

25 Jul 2024, 08:49 वाजता

चालत्या बसमध्ये पाण्याची गळती 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला घरघर लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये महामंडळाकडून सुरू असलेल्या बस या अक्षरशः चालते फिरते सांगाडे झाले आहेत. नंदूरबार आगारातील चालत्या बसमध्ये पाण्याची गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांना अशाच बस मध्ये प्रवास करावा लागला. छतावरून पाणी गळत असल्याने बसमध्ये पाणीचं पाणी झाले होते. कलमाडी ते नंदुरबार प्रवासादरम्यान सुरु असलेल्या या बस मध्ये गळती लागली होती. विद्यार्थी विद्यार्थिनींचा 15 किलोमीटर उभा राहून प्रवास करण्याची वेळ या बस मुळे आली. बैठकीच्या ठिकाणी पाणी असल्याने सीटवर बसून विद्यार्थ्यांच्या प्रवास करता आला नाही.

25 Jul 2024, 08:29 वाजता

अंबाडा येथील शेतकऱ्यांनी मागितली आत्मदहनाची परवानगी

वरुड तालुक्यातील अंबाडा इंदूर हा पानंद रस्ता जून 2024 मध्येच तयार करण्यात आला मात्र हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच 23 जुलै रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने हा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे यामुळे शेतीची कामे ठप्प झाली शेतीचे काम करणे कठीण झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. हा रस्ता पूर्ववत दुरुस्त करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना आत्मदहनाची परवानगी द्यावी अशी मागणी अंबाडा येथील शेतकरी सर्वेश ठाकरे, योगेश कानफाडे, नितीन खंडस्कर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

25 Jul 2024, 08:25 वाजता

पुढील 24 तासात मुंबई-उपनगरात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज 

पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. यावेळी वारे ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. 

25 Jul 2024, 08:12 वाजता

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

कल्याण डोंबिवलीत कल्याण ग्रामीण परिसराला काल पावसाने चांगलच झोडपून काढल होतं. रात्री मुसळधार पाऊस सुरु होता. पहाटे पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र अर्ध्या तासापासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. यामुळे स्टेशन परिसरात पाणी साचायला सुरवात झाली आहे.

25 Jul 2024, 08:02 वाजता

खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग 

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

25 Jul 2024, 07:30 वाजता

शेतकऱ्यांना विम्याचा लाभ 

पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एक लाख 98 हजार 552 शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. आमदार डॉ संदीप धुर्वे यांच्या मागणीनंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी अधिकारी व विमा कंपन्यांची बैठक घेतली. त्यात आर्णी केळापूर घाटंजी सह जिल्ह्यातील अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना 43 कोटी 65 लाख 75 हजार रूपये अदा करण्याचा आदेश झाला.

25 Jul 2024, 07:29 वाजता

महाडमध्ये सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

सावित्री नदीचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क केले आहे. पाली येथील अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचंलय. यामुळे खोपोली वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अंबा, सावित्री , कुंडलिका नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ , कर्जत , खालापूर भागात जोरदार पाऊस नेरळ ते दहीवली पुलावरून पाणी वाहू लागले,पुल वाहतुकीसाठी बंद आहे. रोहा ते कोलाड मार्गावर पाणी साचलं आहे.

25 Jul 2024, 07:25 वाजता

पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ 

खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायत्यांमध्ये पाणी शिरलय.  एकता नगर परिसरातील पाच ते सहा सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेले आहेत. मध्यरात्री लोक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोसायटीमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्व सूचना प्रशासनातून देण्यात आली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अचानकपणे पाणी वाढल्याने 200 पेक्षा जास्त लोक अडकले होते. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं आहे. दरम्यान सध्या खडकवासला धरणातून 35000 क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात येत आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा विसर्ग रात्रीतून चौपट करण्यात आला आहे. त्यात आवश्यकतेनुसार घट किंवा वाढ होऊ शकते असं पाटबंधारे विभागाकडून कळवण्यात आलं आहे.

25 Jul 2024, 07:24 वाजता

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश 

हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 25 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.