Breaking News LIVE : मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पाहुया एका क्लिकवर 

Breaking News LIVE : मध्य पुण्यात अंधार; वीज पुरवठा सुरळीत होण्यास तीन तास लागणार

Maharashtra Breaking News LIVE: भाजपचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झालेत.. आज मालवणमध्ये जाऊन शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत. पुतळा अपघात प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी महायुतीवर टीका केलीये.आज सकाळी मविआचे नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढून शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं त्याचा निषेध करणार आहे.. सकाळी 11 वाजता मालवण तहसील कार्यालयाबाहेर मोर्चा काढणार आहेत.

28 Aug 2024, 08:35 वाजता

पुण्यातील शिवाजीनगर ते स्वागरगेट भुयारी मेट्रो रखडली

पुण्यातील शिवाजीनगर ते स्वागरगेट भुयारी मेट्रो रखडलीये.. या मेट्रोचं 95 टक्के काम पूर्ण झालंय.. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी ही मेट्रो पुणेकरांसाठी सुरु होईल असा दावा पुणे मेट्रोकडून करण्यात आला होता.. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या मंजुरीअभावी भुयारी मेट्रो लटकलीये.. अद्याप या मेट्रोलो सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळालेली नाहीये.. तपासणीनंतरच मेट्रोला मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे भुयारी मेट्रोसाठी पुणेकरांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

28 Aug 2024, 08:34 वाजता

नारायण राणे  पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला देणार भेट 

भाजपचे खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल झालेत.. आज मालवणमध्ये जाणार आहेत.. शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या घटनास्थळाला ते भेट देणार आहेत.. त्यानंतर मालवणमध्ये ते दुपारी 12च्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत.. या पत्रकार परिषदेतून राणे काय बोलणार याकडे  सा-यांचं लक्ष लागलंय..

28 Aug 2024, 08:34 वाजता

 राज ठाकरे आज बदलापुरात जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बदलापुरात जाणारेत. बदलापूर अत्याचार पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असणारेय. या वेळी ते चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणा-या बदलापूरकरांची भेट घेणारेत, त्यानंतर राज ठाकरे साने वाडीतल्या अदिती बँक्वेट हॉलमध्ये पालक , आंदोलक बदलापूरकरांशी संवाद साधणारेत... त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय...

28 Aug 2024, 08:33 वाजता

बदलापूर घटनेवरुन शिंदेंच्या आमदाराचा विचित्र युक्तीवाद  

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलीय. "मी काल आंदोलन पाहिलं. सगळे पक्ष त्याच्यावर (बदलापूर घटनेवर) थयथयाट करुन राहिले होते. ही प्रवृत्ती असते. या हरा*खोर नराधमांना मुलीचं वय समजत नाही आणि ते त्यांच्यावर अत्याचार करतात. आता हे सगळे लोक सरकार... सरकार... सरकारने केलं. अरे आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये जाऊन पाहरा देणार का? की पोलीस निरिक्षक त्याच्या घरी जाऊन बसणार आहे? की आरोपी फोन करुन सांगतो की, मी बलात्कार करतोय, ये तू मला पकडायला ये... असं सांगतात का ते?" असा विचित्र युक्तीवाद प्रसारमाध्यमांसमोर केला. "घटना घडल्यानंतर यंत्रणा काम करत असते. पोलीस तपास करतात. त्यांना नाही जमलं तर सीबीआय आहे. सीबीआय नाही झाले एसआयटीवाले करतात. पण आरोपीला सोडत नाहीत. सरकार कारवाई करत नसेल, कोणाला पाठीशी घालत असेल तर रस्त्यावर उतरा," असं संजय गायकवाड म्हणाले.

28 Aug 2024, 08:33 वाजता

बदलापूर घटनेवरुन शिंदेंच्या आमदाराचा विचित्र युक्तीवाद  

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलीय. "मी काल आंदोलन पाहिलं. सगळे पक्ष त्याच्यावर (बदलापूर घटनेवर) थयथयाट करुन राहिले होते. ही प्रवृत्ती असते. या हरा*खोर नराधमांना मुलीचं वय समजत नाही आणि ते त्यांच्यावर अत्याचार करतात. आता हे सगळे लोक सरकार... सरकार... सरकारने केलं. अरे आता मुख्यमंत्री काय महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये जाऊन पाहरा देणार का? की पोलीस निरिक्षक त्याच्या घरी जाऊन बसणार आहे? की आरोपी फोन करुन सांगतो की, मी बलात्कार करतोय, ये तू मला पकडायला ये... असं सांगतात का ते?" असा विचित्र युक्तीवाद प्रसारमाध्यमांसमोर केला. "घटना घडल्यानंतर यंत्रणा काम करत असते. पोलीस तपास करतात. त्यांना नाही जमलं तर सीबीआय आहे. सीबीआय नाही झाले एसआयटीवाले करतात. पण आरोपीला सोडत नाहीत. सरकार कारवाई करत नसेल, कोणाला पाठीशी घालत असेल तर रस्त्यावर उतरा," असं संजय गायकवाड म्हणाले.

28 Aug 2024, 08:29 वाजता

मोदी ज्याला हात लावतात ते कोसळतंय, ठाकरे गटाची टिका 

सामनाच्या अग्रलेखातून महायुतीवर टीकेची झोड उठवलीये.. पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात ते सर्व कोसळताना दिसतंय. शिवरायांचा पुतळाही कोसळला.. जनतेनं संकेत समजून घ्यावेत.. लाडक्या ठेकेदाराला दिलेलं काम आणि त्यात झालेल्या खाऊबाजीमुळे पुतळा कोसळल्याची टीका सामनातून करण्यात आलीये.