डायरेक्ट फोन केला; आता शरद पवारच ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार

महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Oct 19, 2024, 04:47 PM IST
डायरेक्ट फोन केला; आता शरद पवारच ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार

Maharashtra Assembly Elections 2024 :   विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका जाहीर झाल्या तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.  महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद निर्माण झाला आहे. आता शरद पवारचं ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरु आहेत. हा वाद मिटवण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चर्चाही सुरु झाली होती. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी स्वतः दिल्लीतील काँग्रेस नेत्याना फोन केला. तसंच मविआतील वाद मिटवण्यासाठी शरद पवारानी काँग्रेस नेत्यांशी चर्चाही केली आहे.  

महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला 

महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत.. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जागावाटपावरून चांगलंच घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रपत्र असलेल्या काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. त्यामुळे ऐन विधानसभेच्या धामधुमीत मविआत जागावाटपावरून चांगलीच घमासान पाहालया मिळत आहे..

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली...पवारांच्या सल्ल्यानुसारच पुढील रणनीती राहणार असल्याचं चेन्नीथला यांनी म्हंटलंय...त्याचबरोबर उद्धव ठाकरेंसोबतही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं... महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं... तर, एक ते दोन दिवसांत महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार टीका केली...

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More