कांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण?

 तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल. 

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 8, 2020, 10:41 PM IST
कांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण? title=

मुंबई : जर तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगावमध्ये गुरुवारी कांद्याच्या दरात क्विंटल ६०० रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच सोमवारपर्यंत ३८०० रुपये क्विंटलला मिळणारा कांदा आज ४४०० रुपये क्विंटल झाला आहे. तुम्हाला तुमच्या अन्नात कांदा खाण्याची आवड असेल तर, ही सवय तुम्हाला मोडण्याची गरज आहे. कारण गुरुवारी (८ ऑक्टोबर) महाराष्ट्रातील लासलगावमध्ये प्रति क्विंटल ६०० रुपयांची वाढ झाली आहे. याचा परिणाम देशभरातील इतर बाजारावर परिणाम घडण्याची शक्यता आहे.

कांद्याचा नवा दर काय आहे?

लासलगावला कांदा तीन प्रकारात विभागला आहे. एकदम चांगला, चांगला आणि खराब कांदा. आज एकदम चांगल्या कांद्याची किंमत ४४०० रुपये क्विंटल आहे. आणि योग्य कांद्याची किंमत ३५०१ रुपये आहे. तर छोट्या किंवा खराब झालेल्या कांद्याची किंमत १००० रुपये क्विंटल आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कांद्याच्या किंमती वाढविण्याचा परिणाम पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत दिसून येतो.

या हंगामात लाल कांदा कर्नाटक आणि बेंगळुरु येथून येत असे, परंतु त्या भागात पावसामुळे कांद्याचे पीक नष्ट झाले आहे. कांद्याचे नवीन पीक येण्यास किमान दोन महिने लागतील. येत्या काही दिवसांत खरेदीदारांना आपले पाकीट सैल करावे लागेल.

सप्टेंबरच्या सुरुवातीला सरकारने कांद्याच्या सर्व जातींच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात लासलगाव, नाशिक आणि महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरण्यास भाग पाडले. देशातील बाजारातील कांद्याच्या वाढत्या किंमतींवर आळा घालणे आणि त्याची उपलब्धता वाढविणे ही सरकारची भूमिका होती.

विदेश व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, “सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर त्वरित परिणाम म्हणून बंदी घालण्यात आली आहे.” वाणिज्य मंत्रालयाची एक शाखा, डीजीएफटी निर्यात आणि आयातीशी संबंधित मुद्द्यांशी संबंधित आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने (एमएसजीएए) त्वरित निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. बंदी जाहीर होण्यापूर्वी मार्चपासून देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील किचन बल्बचे दर दुपटीने वाढून तीन हजार रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत.