...तर कितीही पाऊस पडला तरी बदलापूरला कधीच पूर येणार नाही; उल्हास खोऱ्यात नव धरण

ठाणे जिल्ह्यातील पोशिर धरणाला मिळाले शास्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.   

वनिता कांबळे | Updated: Jul 13, 2024, 06:12 PM IST
  ...तर कितीही पाऊस पडला तरी बदलापूरला कधीच पूर येणार नाही;  उल्हास खोऱ्यात नव धरण title=

Badlapur News :  पोशिर धरणाला राज्याच्या जलस्त्रोत विभागाकडून शाश्वत पाणी साठ्याचं प्रमाणपत्र मिळाल आहे. उल्हास नदीची उपनदी असलेलं पोशीर धरण झाल्यास ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटणारेय. तर उल्हास खो-यांतून येणारं पाणी अडल्यास बदलापूरचा पुराचा धोकाही टळणार आहे. पोशीर धरणाला जलस्त्रोत खात्याकडून शाश्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांना बदलापूर जवळील बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या व्यतिरिक्त ठाणे जिल्ह्याला कोणतीही पर्यायी जलस्रोत नाही. त्यामुळे उल्हास नदीची उपनदी असलेल्या कर्जत तालुक्यातील पोशिर धरण झाल्यास ठाणे जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटणारच आहे.  तसेच या धोरणामुळे उल्हास खोऱ्यातून येणार पाणी अडल्यास बदलापूर  परिसराला भेडसावणारा पुराचा धोकाही टळणार आहे.

पोशिर धरणाला राज्याच्या जलस्त्रोत विभागाकडून शास्वत पाणी साठ्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने पोशिर धरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पोशिर धरण हे ठाणे जिल्ह्यासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचं माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सांगितले. 

पोशीर धरणाचा फायदा कुणाला होणार?

15 वर्षापूर्वी राज्य शासनाने जलतज्ज्ञ डॉ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने वाढती लोकसंख्या आणि बांधकाम यामुळं पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने पोशीर धरणाची गरज व्यक्त केली होती.  2016मध्ये सर्व परवानग्या घेऊन पोशीर धरणाचे बांधकाम सुरु करण्यात आले. 2030 पर्यंत धरमाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास खोऱ्यात पोशीर धरण बांधण्यात येत आहे. चाई, बोरगाव, पेंडरीव, बोरशेत, चेवणे, उंबरखांड, भोपाळी ही गाव धरणामुळे बाधित होणार आहेत.  या धरणार 355 दलघमी इतका पाणीसाठा राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख शहरांना बदलापूर जवळील बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पोशिर धरण झाल्यास ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठ्याचा नवा स्त्रोत मिळणार आहे. 

बदलापुरात रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली असून  या वाहिनीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी अक्षरशः 10 ते 15 फूट उंच कारंजा सारखे बाहेर पडत आहे.  बदलापूर एमआयडीसी परिसरातील कंपन्यां मधील सांडपाणी वाहून नेणारी ही वाहिनी आहे. गेल्या सहा महिन्यात २० ते २५ वेळा अशा प्रकारे ही वाहिनी फुटली आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.