'लोकमान्यांनी २०११ साली शिर्डीत येऊन साईबाबांचा सत्कार केला.'

 पुणेकरांनी त्यांना टाळ्यांचा प्रसाद दिला आणि सभागृहात एकच धमाल उडाली. 

Updated: Aug 2, 2018, 05:11 PM IST
'लोकमान्यांनी २०११ साली शिर्डीत येऊन साईबाबांचा सत्कार केला.' title=

पुणे : लोकमान्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचा सत्कार केला होता असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. मात्र त्याविषयीचा तपशील देताना ते काहीसे गडबडले, तेव्हा पुणेकरांनी त्यांना टाळ्यांचा प्रसाद दिला आणि सभागृहात एकच धमाल उडाली.

२०११ चा उल्लेख

निमित्त होतं टिळक स्मारक ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान समारंभाचं....  टिळक आम्हाला जवळचे असे सांगताना, 'साईबाबा यांचा सत्कार शिर्डीला टिळकांनी २०११ साली केला' असं त्यांनी म्हटलं.

चुकीची दुरूस्ती 

२०११ चा उल्लेख २ वेळा केल्यानं हशा पिकला. त्यावर आपली चूक सुधारत हा सत्कार १९१० याला झाला अशी दुरुस्ती त्यांनी केली.