...म्हणून राज ठाकरे भेटल्यानंतरही नाणारवासीय झाले नाराज

Updated: May 24, 2018, 10:49 PM IST

रत्नागिरी : कोकण दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली. राज ठाकरे भेटणार म्हणून नाणारवासीय महिलांसह मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. मात्र राज ठाकरे आले आणि काही मिनिटांतच निघून गेल्यानं नाणारवासियांनी नाराजी व्यक्त केली. 

राज यांचा नाणारवासियांशी अवघा पाच मिनिटांचा संवाद झाला. पाच मिनिटांच्या भेटीत नाणारवासियांनी आंदोलनासाठी राज ठाकरेंकडे सहकार्याची मागणी केली.

यावर आपण नाणारवासियांसोबत असल्याचं सांगत, लवकरच पुढली भूमिका ठरवू असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.