उदय सामंत यांचा 'गूगल मॅप'ने घात केला, आणि गाडीवर हल्ला झाला? वाचा नेमकं काय घडलं

Uday Samant car attacked in Pune : शिंदे गटात दाखल झालेले आमदार उदय सामंत शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे.  

Updated: Aug 3, 2022, 03:41 PM IST
उदय सामंत यांचा 'गूगल मॅप'ने घात केला, आणि गाडीवर हल्ला झाला? वाचा नेमकं काय घडलं  title=

पुणे : Uday Samant was car attacked in Pune : शिंदे गटात दाखल झालेले आमदार उदय सामंत चुकून शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर आली आहे. मुख्यमंत्र्याच्या कॉनव्हॉयसाठी पोलिसांनी मार्ग ठरवून दिला होता. मात्र उदय सामंत यांनी तो मार्ग पाळला नाहीत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

आमदार उदय सामंत मुख्यमंत्र्यांचा कॉनव्हॉय सोडून निसर्ग हॉटेलकच्या दिशेने जेवणासाठी निघाले होते. हॉटेलकडे जाण्यासाठी त्यांनी  'गूगल मॅप'चा आधार घेतला आणि ते चूकून आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचले असं पोलीस सूत्रांनी सांगतले. 

उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे.  पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये शिवसैनिक विरुद्ध शिंदे गट असा राडा झाला. शिवसैनिकांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाड्यांवर हल्ला होता. याप्रकरणी ही अटक झाली आहे.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंची सभा कात्रजमध्ये सुरु असताना तिथून सामंत यांच्या गाड्यांचा ताफा निघाला होता. सिग्नलला सामंतांची गाडी उभी असताना, शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करुन गाडीच्या काचा फोडल्या, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.  याप्रकरणी सामंत यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उदय सामंत यांचा थेट इशारा

दरम्यान, या हल्ल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी इशारा दिला आहे. आम्ही 50 आमदारांना फोन करुन मतदार संघात सांगितले तर त्याचे पडसाद उमटतील, असा इशारा उदय सामंत यांनी शिवसेनेला दिला आहे. 

दहा लोकांना आतापर्यंत अटक झाली आहे, त्यांच्याकडे हत्यार असल्याचं आढळून आलं आहे. सभेला जाताना कशाला हत्यार घेतली जातात. या हल्लेखोरांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर कारवाई नको, ही माझी भूमिका असल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आम्हाला संघर्ष करायची सवय आहे, आम्ही परशुराम भूमीतून आलो आहे, असे सामंत म्हणाले.