Mumbai Court: 'पत्नीच नव्हे तर कुत्र्यालाही.....', घटस्फोटीत पतीला कोर्टाचा महत्वाचा आदेश

Alimony Paid for Wifes: महिलेचे सप्टेंबर 1986 मध्ये प्रतिवादी (बंगळुरू येथील व्यापारी) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि 2021 मध्ये प्रतिवादीने तिला मुंबईला पाठवल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.

Pravin Dabholkar | Updated: Jul 11, 2023, 03:31 PM IST
Mumbai Court: 'पत्नीच नव्हे तर कुत्र्यालाही.....', घटस्फोटीत पतीला कोर्टाचा महत्वाचा आदेश title=

Alimony Paid for Wifes: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत आता तिच्या तीन कुत्र्यांनाही पोटगी मिळणार आहे. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पतीला हा आदेश दिला आहे. पाळीव प्राणी लोकांना निरोगी जीवन जगण्यास मदत करतात आणि नातेसंबंधांमधील संघर्षांमुळे निर्माण होणारी भावनिक कमतरता दूर करतात. . मुंबईतील एका न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात निरीक्षण नोंदविले आहे. महिलेकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. ती आजारी असून तिला आरोग्याच्या समस्या आहेत. याशिवाय तीन कुत्र्यांची जबाबदारीही तिच्यावर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. 

महिलेने पतीशी फारकत घेतना पतीकडे पोटगी मागितली. मला प्रकृतीचा त्रास असून तीन पाळीव कुत्रेही माझ्यावर अवलंबून असल्याचे तिने सांगितले. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (वांद्रे कोर्ट) 

कोमलसिंह राजपूत यांनी 20 जून रोजी यासंदर्भात अंतरिम आदेश दिले. वेगळी राहणाऱ्या 55 वर्षीय पत्नीला देखभाल म्हणून 50,000 रुपये दरमहा देण्याचे निर्देश दिले. आपल्याला पाळीव कुत्र्यांना सांभाळता येणार नाही अशी तिची याचिका फेटाळली. या प्रकरणाचा सविस्तर आदेश नुकताच उपलब्ध झाला आहे. 

दंडाधिकारी म्हणाले, 'मी या युक्तिवादांशी सहमत नाही. पाळीव प्राणी देखील सुसंस्कृत जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहेत. पाळीव प्राणी नातेसंबंध तुटल्यामुळे होणारी भावनिक अंतर भरतात. त्यामुळे पाळीव प्राणी निरोगी मानवी जीवनासाठी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

त्यामुळे पोटगीची रक्कम कमी करण्याचा हा आधार असू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सप्टेंबर 1986 मध्ये प्रतिवादी (बंगळुरू येथील व्यापारी) सोबत लग्न झाले होते. लग्नाच्या अनेक वर्षानंतर त्यांच्यात काही मतभेद झाले आणि 2021 मध्ये प्रतिवादीने तिला मुंबईला पाठवल्याचे महिलेने कोर्टात सांगितले.

महिलेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत महिलेकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याचे म्हटले आहे. ती आजारी असून तिला आरोग्याच्या समस्या आहेत. याशिवाय तीन कुत्र्यांची जबाबदारीही तिच्यावर असल्याचे याचिकेत म्हटले आहे. पतीने पत्नीला पोटगी देण्याचे आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते पण हे आश्वासन पूर्ण केले नाही. तिच्या वैवाहिक जीवनात त्याने अनेकवेळा घरगुती हिंसाचार केल्याचेही याचिकेत म्हटले आहे.