कलावंताना मदत मिळत नसल्याने अमृता फडणवीस यांची सरकारवर टीका

अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारकडून मदत मिळत नसल्याने व्यक्त केला संताप

Updated: May 21, 2021, 05:41 PM IST
कलावंताना मदत मिळत नसल्याने अमृता फडणवीस यांची सरकारवर टीका title=

अमित जोशी, मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना, तसंच कलावंतांना सरकारकडून पुरेशी मदत होत नसल्याने अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

कलाकार असो किंवा अन्य क्षेत्र संवेदनशीलपणे सरकारने लक्ष दिलं पाहिजे, कलाकारांना रेशन देण्याबाबत घोषणा केली होती ती त्यांना मिळाली पाहिजे, ग्राऊंड लेवलला उतरून मदत केली पाहिजे, हे जर होत नसेल तर सरकारमध्ये रहाण्याचा काय फायदा असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. 

धारावीमध्ये भाजपतर्फे काही कलावंतांना रेशन देत मदत करण्यात आली. अमृता फडणवीस यांच्या हस्ते 20 पेक्षा जास्त कलावंतांना मदत देण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.