बाळासाहेब थोरात यांचा भाजपावर गंभीर आरोप

असा आरोप महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे.

Updated: Nov 7, 2019, 07:41 PM IST
बाळासाहेब थोरात यांचा भाजपावर गंभीर आरोप title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजपाने अनेक आमदारांशी संपर्क सुरू केलेला आहे, साम दाम दंड वापरून निवडणुकीआधीपासून हे सुरू आहे. आता निवडणुकीनंतर हे पुन्हा त्याचा वापर करत आहेत, असा आरोप महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे.

यांनी काय मॅटर्निटी होम उघडलंय?

बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना म्हटलं आहे, भाजपाच्या काही नेत्यांकडून रोजच सांगितलं जात आहे की, लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल, आम्ही गोड बातमीची वाट पाहतोय, पण ती काही येत नाही, यांनी काय मॅटर्निटी होम उघडलंय का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

या परिस्थितीला भाजपा जबाबदार

सरकार स्थापन करण्यास जो विलंब होत आहे, त्या सर्व परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. एकतर भाजपाला मित्र पक्षांना सांभाळता आलं नाही, आणि दिलेला शब्द या पक्षाकडून पाळला जात नाही. हा दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाराष्ट्रासाठी हा अडचणीचा भाग बनून राहिला असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.