रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Updated: May 14, 2018, 03:33 PM IST

मुंबई : बोरीवली-कांदिवली दरम्यान रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडलीये. पोयसरजवळ हा भीषण अपघात झालाय. सागर,साईप्रसाद, मनोज, दत्तप्रसाद अशी चौघा भावांची नावे आहेत. चव्हाण कुटुंबातले हे चौघेही सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या फोंडाघाटहून मुंबईला आले होते. पोयसरला उतरले असताना समोरुन येणाऱ्या एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या चौघांचा जागीच मृत्यू झाला. दत्तप्रसाद आणि साईप्रसाद हे दोघे सख्खे भाऊ होते. अपघातात मृत पावलेल्या या चौघांची वयं १७ ते २३ वयोगटातली होती.