'खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये'

राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते?  

Updated: Jun 16, 2020, 10:31 AM IST
'खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये' title=

मुंबई : राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते? मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी आणि किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरेंना नाही. सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री झाले, तेव्हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याही स्थितीत काही पोटदुख्या लोकांनी असा पेच टाकला होता की, हे राज्य महिनाभर टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले आहे. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या  हाती दिले आहे. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्धभवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्त पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात, असे शिवसेनेने म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचेही बरे सुरु आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनीआहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू, असे थोरातांनी सांगितले आहे. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही 'इंडियन एक्सप्रेस'ला एक जोरदार मुलाखत दिली. तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले, सरकारला अजिबात धोका नाही. पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहेत. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोल! आता असे टरल्याचे समजते की, कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्रीमहोदय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडणार आहेत.

राजकारणातील ही जुनी खाट महाराष्ट्रात कुरकुरु का लागली आहे, आमचे ऐका म्हणजे काय, यावरही आता झोत पडला आहे. थोरात आणि चव्हाण हे काँग्रेसचे अनुभवी नेत आहेत. आणि त्यांना सरकार चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र, त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असा दांडगा अनुभव शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांपाशीही आहे. तथापि कुरकुर आणि कुरबूर होताना दिसत नाही. प्रशासनातील काही अधिकारी कारभारी असल्यासारखे वागतात आणि काँग्रेस नेत्याशी नीट वागत नाहीत,अशी तक्रार काँग्रेसवाले करीत असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. मुख्य सचिव अजोय मेहता आणि नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढ याच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारीच सुरु आहेत. पण शेवटी अधिकारी कितीही बडा असला तरी तो सरकारचा नोकर म्हणून मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळतो. मुख्य सचिवांना वारंवार मुदतवाढ मिळत आहे. त्यामुळे प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांत अस्वस्थता आहे, अशी एक तक्रार आहे. यावर चर्चा होऊ शकते. मात्र, प्रशासनाकडून एखादे बेकायदेशीर किंवा नियबाह्य काम झाल्याची तक्रार नाही. कोविडच्या संकटात संपूर्ण प्रशासन  झुंज देताना दिसत आहे. तरीही चव्हाण-थोरातांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायलाच हवे. कारण सरकारचा तिसरा पाय काँग्रेसचा आहे, असे सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.

राज्यापल नियुक्त १२ विधान परिषद जागांच्या समान वाटपाचा मुद्दा आहे. तो विषय काही कुरबूर किंवा कुरकुरीचा नाही. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ ४४, शिवसेना ५६ आणि इतर जोडीदार पकडून ६४ वर पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे ५४. त्यामुळे त्या प्रमाणात वाटप व्हायला हरकत नाही. सत्ता वाटपात सगळ्यात मोठा त्याग शिवसेनेचा आहे. विधानसभा अध्यक्ष वादावर तोडगा काढला गेला. सेनेच्या वाट्याचे एक कॅबिनेट मंत्रिपद राष्ट्रवादीला देण्यात आले. काँग्रेसला राज्यमंत्र्यांचे प्रमोश करुन दोन कॅबिनेट दिले. समान सत्तावाटपातही इतके वाट्यास आले नसते, पण मुख्यमंत्र्यांनी कुरकुर न करता दिले आणि त्याबद्दल सहा महिन्यांत कोणाची खाट कुरकुरली असे झाले नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.