मोठी बातमी । टाटा समूहाला मिळणार एअर इंडियाचे हक्क?

Tata Group : टाटा सन्स एअर इंडियाचे नवे मालक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Updated: Oct 1, 2021, 01:14 PM IST
मोठी बातमी । टाटा समूहाला मिळणार एअर इंडियाचे हक्क? title=

मुंबई : Tata Group : टाटा सन्स (Tata Sons) एअर इंडियाचे (Air India) नवे मालक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. टाटा सन्सकडून मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. टाटा सन्सने एअर इंडियाची बोली जिंकली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Tata Group wins Air India bid: Reports) त्यामुळे आता टाटा समूहाला एअर इंडियाचे हक्क मिळणार आहे. एअर इंडियाच्या पॅनलकडून टाटा ग्रूपची निवड करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

सरकारी कंपनी एअर इंडिया (Air India) पुन्हा एकदा टाटाची होणार आहे. वृत्तानुसार, एअर इंडियासाठी (Air India) बोली लावण्यात आली होती, जी टाटाने जिंकली आहे. टाटा ग्रुप आणि स्पाइसजेटचे अजय सिंह यांनी एअर इंडियासाठी बोली लावल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, दुसरी वेळ आहे जेव्हा सरकार एअर इंडियामधील आपला हिस्सा विकण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी 2018 मध्ये सरकारने कंपनीतील 76 टक्के भागविक्री करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी प्रतिसाद मिळाला नव्हता.

सरकारने गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाइसजेटच्या संस्थापकाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक बोलींचे मूल्यांकन केले होते. आर्थिक बोलींचे मूल्यांकन अज्ञात राखीव किमतीच्या विरूद्ध केले गेले आणि त्या बेंचमार्कपेक्षा जास्त किंमत देणारी बोली स्वीकारली गेली, असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हे एअर इंडियाचे 67 वर्षांनंतर टाटा समूहात परत येण्याचे चिन्ह आहेत. टाटा समूहाने ऑक्टोबर 1932 मध्ये टाटा एअरलाईन्स म्हणून एअर इंडियाची स्थापना केली. सरकारने 1953 मध्ये विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.

सरकार सरकारी मालकीच्या राष्ट्रीय विमानसेवेतील आपला 100 टक्के हिस्सा विकत आहे, ज्यात एअर इंडिया लिमिटेडमध्ये एअर इंडियाचा 100 टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचा 50 टक्के हिस्सा आहे.