'...तर आमिरचं काय चुकलं?'

‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.

Updated: May 15, 2012, 04:54 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी त्याची लोकप्रियता वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.

 

दोन आठवड्यांपूर्वी आमिरचा ‘सत्यमेव जयते’ या सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. दोन आठवड्यांतच या कार्यक्रमानं सामाजिक विषयांबाबत जागृत होण्यास भाग पाडलं. काही वेळातच हा कार्यक्रम हिट ठरला. त्यानंतर लगेचच विविध मुद्यांवरून ‘सत्यमेव जयते’ आणि आमिर खान दोघेही वादात अडकले. ‘युफोरिया’ बँडचे गायक पलाश सेन, लेखिका तसलिमा नसरिन तसंच आयटम गर्ल राखी सावंत यांनी त्याच्यावर तोंडसुख घेतलं.  सुपरस्टार्स आपल्या सुंदर चेहऱ्यांचा वापर करून मुद्यांचं भांडवल करतात, अशी टीका यावेळी त्याच्यावर झाली होती. यावरच शेखर कपूर संतापलाय. त्यानं ट्विटरवर लिहलंय, ‘आमीरला या कार्यक्रमासाठी मानधन दिलं जातं, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो का? महत्त्वाच्या सामाजिक विषयांबद्दल जनजागृती करण्यासाठी तो त्याची लोकप्रियता वापरत असेल तर त्यात गैर काय आहे? असं आत्तापर्यंत तरी कुणीही केलं नव्हतं.'

 

आमिरच्या केवळ नावामुळेही ही काही सामाजिक मुद्दे लोकांपर्यंत तीव्रतेने पोहचत असल्यास त्यात गैर काय आहे. आपल्या स्टारडमचा चांगल्या कामांसाठीही वापर करता येऊ शकतो, हे त्यानं आपल्या कृत्यातून दाखवून दिलंय. मग, सामान्य लोकांप्रमाणे ही जनजागृती बॉलिवूडमध्येही होतेय, असंच दिसतंय.