जऴगावमध्ये कापूस शेतकऱ्याची आत्महत्या

कापसाला 6000 रूपये हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन पेटलेले असताना जऴगाव जिल्हात आणखी एका कापूस शेतकऱ्याने आत्महत्या केली.

Updated: Nov 30, 2011, 05:08 AM IST

झी २४ तास वेब टीम, जऴगाव

 

कापसाला 6000 रूपये हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन पेटलेले असताना जऴगाव जिल्हात आणखी एका कापूस शेतकऱ्याने आत्महत्या केली.

 

रतन बुधा असे या शेतकऱ्याचं नाव आहे. ते अमऴनेर तालुक्यातील दहिवलचे रहिवासी आहेत. उशीराच्या पावसाने दुबार पेरणीच्या संकटामुळे कर्जाचा बोजा वाढला होता. हे कर्ज कसे फेडायचे, या धक्क्याने त्यांने आत्महत्या केली.