भारताला विजयासाठी २३७ धावाचं आव्हान

श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

Updated: Feb 14, 2012, 03:09 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान आज दुसरी वन डे अॅडलेडमध्ये सुरू आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

गेल्या काही मॅचमध्ये टीम इंडियाच्या फिल्डिंगचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे टीम इंडियाला याचा मोठा फायदा झाला आहे. आज देखील इंडियाने चांगली फिल्डिंग करत श्रीलंकेच्या ३ बॅट्समनला रनआऊट केले. त्यामुळे ५० ओव्हर मध्ये ९ विकेट गमावून श्रीलंकेने २३६ रनपर्यंतच मजल मारली. श्रीलंकेकडून चंदीमलने सर्वाधिक ८१ रनची खेळी केली. तर भारताकडून विनयकुमारने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

 

चौथ्यापाठोपाठ श्रीलंकेची पाचवी विकेटही गेली आहे. रोहित शर्माच्या बॉलिंगवर चांडिमल ८१ रन्सवर धोनी तर्फे झेलबाद झाला आहे.  श्रीलंकेची चौथी विकेट गेली. विनय कुमारच्या बॉलिंगवर महेला जयवर्धने ४३ रन्सवर पायचित झाला. श्रीलंकेचा स्कोअर १८१/५ असा आहे.याआधी  आर. अश्विनच्या बॉलिंगवर गौतम गंभीरने कुमार संगकाराचा झेल पकडला होता. यापूर्वी   झटपट धावा काढण्याच्या नादात दिलशान तिलकरत्ने इर्फान पठाणच्या बॉलिंगवर धोनीकरवी झेलबाद झाला. श्रीलंकेची पहिली विकेट उपुल थरंगा एकही धाव न घेता आऊट झाला. विनय कुमारच्या बॉलिंगवर धोनीने विकेट घेतली होती. 

 

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लंकेला पराभूत करून टेबल टॉपर बनण्याची टीम इंडियासमोर नामी संधी आहे. रोमहर्षक लढतीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली.

 

श्रीलंकेला या सीरिजमध्ये आत्तापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे पहिल्या विजायाची नोंद करण्यासाठी जयवर्धनेची टीम प्रयत्नशील असेल. लसिथ मलिंगावर त्यांची बॉलिंगची भिस्त असेल. तर बॅटिंगमध्ये तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकाराला स्फोटक बॅटिंग करावीच लागणार आहे. मिडल ऑर्डरची जबाबदारी कॅप्टन महेला जयवर्धने आणि ऍन्जेलो मॅथ्यूजवर असेल.  आता, भारतीय टीम आपली विजयी मालिका कायम राखते की, लंका आपला पहिला विजय मिळविण्यात यशस्वी ठरते याकडेच क्रिकेटप्रेमींच लक्ष असणार आहे.

 

श्रीलंका – 236/9 (ओव्हर 50)

भारत –  0/0 (ओव्हर 0.0)